पोलीस स्टेशनमध्ये बुधवार दिनांक २६ मार्चरोजी रात्री ९.३०ते१० वाजे दरम्यान बिलाचे पैशाचे
कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याने पोलीस स्टेशन आवारात वाद विकोपाला गेल्याने झटापट झाली.
अशा आशयाची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक संजय वाघ यांनी दिली.फिर्यादीवरून आरोपी
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
नितीन वसंतराव गायकी, अविनाश वसंतराव गायकी, क्रिष्णा रवी गायकी, ताराचंद रामलाल पालीवाल,
आशिष ताराचंद पालीवाल, डॉ. अनिल मल्ल, अनुप ताराचंद पालीवाल सर्व राहणार तेल्हारा अशा ७ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी डे- नाईट ऑफिसर ड्युटी करत असताना २६ मार्च रोजी तक्रारदार ताराचंद रामलाल पालीवाल(५८)
रा. तहसीलरोड तेल्हारा व परस्पर विरोधी तक्रारदार नितीन वसंतराव गायकी (३८) साईमंदिर तेल्हारा दोघामध्ये
बिलाचे पैशाचे कारणावरून वाद झाल्याने दोन्ही तक्रारदार पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट देणे करिता आले
असता गावातील प्रतिष्ठित लोकांनी पोलीस स्टेशन येथे येऊन त्यांचेतील वाद मिटवून दोन्ही तक्रारदारांनी
आपसी समझौतानामा झाल्याने दोन्ही तक्रारदार हे तक्रार न देता पोलीस स्टेशन मधून निघून गेले.
त्यानंतर रात्री९.३० वाजता फिर्यादी संजय वाघ पोलीस स्टेशनला दैनंदिन काम करीत असताना ताराचंद पालीवाल,
अनुप पालीवाल, आशिष पालीवाल, डॉ.मल्ल हे पोस्टे आवारामध्ये आले व सकाळचे वादाचे कारणावरून बोलचाल करून वाद घालू लागले.
त्यावादात त्यांनी एकमेकांसोबत झटापट करीत , एकमेकांना मारहाण केली .
म्हणून पोस्टेतील हजर अधिकारी, पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले, भटकर, पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे,
पोलीस कर्मचारी यांनी तो वाद सोडविला.त्यानंतर आरोपी पोस्टे मधून न सांगता परस्पर निघून
गेल्यानंतर आरोपींचे कृत्य भारतीय न्याय संहिता (बी एन एस)२०२३ चे कलम १९४(२) प्रमाणे होत
असल्याने त्यांचे विरुद्ध कायदेशीर तक्रार तेल्हारा पोस्टे मध्ये नोंदविण्यात आली आहे.
व गुन्हा नोंदविण्यात आला आहे.तेल्हारा पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.