टीम इंडियाची विजयी सुरुवात, यूएसएवर 29 धावांनी मात

टीम इंडिया

मुंबई: आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाने दमदार सुरुवात करत अमेरिकेवर 29 धावांनी विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव याने झुंजार खेळी करत भारताला संकटातून बाहेर काढले.

नाणेफेक जिंकून अमेरिकेने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला भारतीय फलंदाजी डळमळीत झाली आणि टॉप ऑर्डर लवकर बाद झाल्याने संघ अडचणीत सापडला. मात्र कर्णधार सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत नाबाद 84 धावा करत डाव सावरला आणि भारताला 20 षटकांत 161 धावांपर्यंत मजल मारून दिली.

162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेची सुरुवातही खराब झाली. भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव कायम ठेवला. अखेर अमेरिका 20 षटकांत 8 बाद 132 धावांपर्यंतच पोहोचू शकली आणि भारताने सामना 29 धावांनी जिंकला.

Related News

या सामन्यात मोहम्मद सिराजसह भारतीय गोलंदाजांनी महत्त्वाच्या विकेट्स घेत अमेरिकेची धावगती रोखली. फलंदाजी अपयशी ठरत असताना कर्णधाराने जबाबदारी स्वीकारत संघाला सन्मानजनक धावसंख्या मिळवून दिली, हीच विजयाची गुरुकिल्ली ठरली.

विशेष म्हणजे कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची ही खेळी ऐतिहासिक ठरली असून टी-20 वर्ल्ड कपमध्ये पदार्पणातील कर्णधारांच्या डावांमध्ये ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी आहे.

या विजयासह भारताने स्पर्धेत आत्मविश्वासाने पाऊल टाकले असून विजेतेपदाच्या बचाव मोहिमेला शानदार प्रारंभ केला आहे. पुढील सामन्यांसाठी संघाचा आत्मविश्वास वाढला असून चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

read also : https://ajinkyabharat.com/u19-world-cup-2026-final-bharatcha-explosive-100-dhawani-vijay-suryavanshi-power-show-team-indiacha-6th-book/#google_vignette

Related News