ताणतणावामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या वाढतेय!

ताणतणावामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या वाढतेय!

कारंजा लाड (प्रतिनिधी – सुनिल फुलारी) – शासकीय कार्यालयांतील वाढता कामाचा बोजा,

वेळेच्या चौकटीत अडकलेले कागदोपत्री काम, अपुरा कर्मचारी वर्ग आणि व्यवस्थापकीय दबाव या साऱ्या गोष्टींचा विपरित परिणाम आता

शासकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होताना दिसतोय. विशेषतः उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) ही समस्या झपाट्याने वाढतेय.

कारंजा लाड येथील विविध शासकीय विभागांत घेतलेल्या पाहणीतून स्पष्ट झाले की बहुतांश कर्मचाऱ्यांना तणावामुळे झोपेचा अभाव,

थकवा, डोकेदुखी आणि मानसिक अस्वस्थता जाणवतेय.

याचेच पुढचे टोक म्हणजे हायपरटेन्शनसारख्या दीर्घकालीन आजारांना निमंत्रण.

दडपण, अपुरा वेळ आणि आरोग्याच्या दुर्लक्षाची साखळी

एका कर्मचाऱ्याने सांगितले, “वरिष्ठांचा तगादा, वेळेचे बंधन आणि वारंवार बदलणाऱ्या शासकीय आदेशांमुळे मानसिक शांतता उडाली आहे.

घरच्यांसाठी वेळच मिळत नाही. खाण्यापिण्याचेही वेळापत्रक राहात नाही. हे सगळं आरोग्यावरचं संकट बनून आलंय.”

विशेष म्हणजे…

  • सतत संगणकासमोर बसून काम

  • अपुरा कर्मचारी वर्ग

  • वेळेवर काम पूर्ण करण्याचे दडपण

  • वरिष्ठांकडून अपेक्षांचा मारा

  • वारंवार होणाऱ्या प्रशासकीय तपासण्या

या सर्व कारणांनी मानसिक आणि शारीरिक तणाव वाढून, हायपरटेन्शन, मधुमेह, निद्रानाश आणि थकवा यासारख्या समस्या सर्वसामान्य झाल्या आहेत.

आरोग्य तज्ज्ञांचा इशारा

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, “सततचा तणाव आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे रक्तदाब अनियंत्रित होतो.

यावर उपाय म्हणून संतुलित आहार, नियमित व्यायाम, योगा, मेडिटेशन आणि तणाव व्यवस्थापन हे अत्यावश्यक आहे.”

प्रशासनाने घ्यावी जबाबदारी

या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने पुढाकार घेत नियमित आरोग्य तपासणी, योगशिबिरे,

तणावमुक्ती कार्यशाळा आणि कार्यविभाजनाचे संतुलन या दिशेने पावले उचलण्याची गरज आहे.

अन्यथा वाढत्या तणावामुळे शासकीय यंत्रणाच आजारी पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

शेवटी एकच मागणी – ‘कामासाठी आरोग्य गमावू नये!’

Read Also : https://ajinkyabharat.com/karanja-madhyay-first-chowk-master-class-workshopla-beauty-prayerch/