पावसाळ्यात उदभवणाऱ्या अनेक साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे.
त्यात डेंग्यूच्या साथीचादेखील समावेश आहे.
त्यात महाराष्ट्रात काही दिवसांपासून डेंग्यूचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत.
Related News
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
१७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
अकोट : मच्छीसाथ परिसरात बस व मोटारसायकलचा भीषण अपघात —
१०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी — एएनएम कोर्ससाठी १० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
दुनियातील सर्वात उंच चिनाब ब्रिज वर तिरंगा फडकावत PM मोदी; चीन-पाकिस्तानला ठाम संदेश
आमदार अमोल मिटकरी त्यांच्या निवासस्थानी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
अकोल्याच्या आळंदा ग्रामपंचायतीचा पुढाकार जिल्हा परिषद च्या शाळेत प्रवेश घेणाऱ्यासाठी करमाफीची घोषणा.
कापशी रोडवरील वादळी वाऱ्यामुळे बाबळीच मोठं झाड कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही.
ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोटमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई;
अकोट येथील मंडळ अधिकाऱ्यावर प्राण घातक हल्ला
बुलडाणा अर्बन अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन.
त्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
केवळ महाराष्ट्रातच नाही, तर कर्नाटक, केरळ आणि इतर काही राज्यांमध्येही
डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतेय.
त्यामुळे या आजारांपासून दूर राहण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे.
याविषयी डॉ. सुरंजित चटर्जी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
डेग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे.
हा आजार एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांमुळे होते.
त्यात अचानक ताप येणे, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमध्ये वेदना, स्नायू व सांधेदुखी,
मळमळ, उलट्या, सूज येणे, पुरळ यांसारखी लक्षणे जाणवतात.
या आजारात रक्तप्रवाहात गुठळ्या तयार करणाऱ्या पेशींची (प्लेटलेट्स)
संख्या कमी होते आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांचे गंभीर नुकसान होते.
परिणामतः शॉक, अंतर्गत रक्तस्राव आणि अवयव निकामी होऊ शकतात.
डेंग्यूची चाचणी कधी करावी ?
तुम्हाला वर सांगितलेल्यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार,
डेंग्यू १ अँटिजन चाचणी करावी लागते.
नंतर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी अँटीबॉडी चाचणी करण्यास सांगितले जाते.
त्यावेळी चाचणी करण्यासही सांगितली जाते.
त्यात तुम्हाला डेंग्यूचे निदान झाल्याचे दिसले, तर प्लेटलेट्सची संख्या तपासण्यासाठी देखील
एक चाचणी करण्यास सांगितली जाते.
सर्वांत महत्त्वाचे मार्कर म्हणजे (पॅक्ड सेल व्हॉल्यूम) चाचणी; ज्यात रक्ताच्या घनतेचे मोजमाप केले जाते.
हे लाल रक्तपेशींमध्ये वाढ किंवा निर्जलीकरण दर्शविते.
Read also: https://ajinkyabharat.com/heavy-rain-like-rain-in-chandoli-dam-area-of-u200bu200bsangli/