मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचं वातावरण उसळलं आहे.
मणिपूरमधील पश्चिम इम्फाळ जिल्ह्यात हिंसाचार झाल्याची
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
माहिती आहे. गोळीबाराने मणिपूर पुन्हा हादरलंय. गावात
कुकी दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. अंदाधुंद गोळीबार
आणि ड्रोनने बॉम्ब हल्ला केला असून अचानक झालेल्या या
हल्ल्यामुळे दहशत पसरली आणि जीव वाचवण्यासाठी नागरिकांची
पळापळ झाली. या दुर्दैवी हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून
9 जण जखमी झाले आहेत. इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कौत्रुक
परिसरात कथित कुकी अतिरेक्यांनी हल्ला केला. कोत्रुक गावच्या पंचायत
अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास
सशस्त्र दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यावेळी गावातील स्वयंसेवक
संवेदनशील भागात नव्हते. अतिरेक्यांनी केलेल्या जोरदार गोळीबारामुळे
अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. गोळीबार आणि बॉम्बस्फोट सुरू झाले
तेव्हा गावकरी आपापल्या घरात होते. या हल्ल्याबाबत मणिपूर पोलिसांनी
दिलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. कुकी अतिरेक्यांनी हायटेक
ड्रोनचा वापर केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अशा ड्रोनचा वापर फक्त
युद्धातच होतो. या ड्रोनद्वारे हल्ला करण्यासाठी उच्च प्रशिक्षित आणि तांत्रिक
तज्ञ असणे आवश्यक आहे. या संपूर्ण घटनेत मोठे षडयंत्र असण्याची
शक्यता नाकारता येत नाही,असा दावा पोलिसांनी केलाय.
Read also: https://ajinkyabharat.com/maharajas-effigy-was-not-broken-or-broken-in-malvan-sanjay-raut/