मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचं वातावरण उसळलं आहे.
मणिपूरमधील पश्चिम इम्फाळ जिल्ह्यात हिंसाचार झाल्याची
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
माहिती आहे. गोळीबाराने मणिपूर पुन्हा हादरलंय. गावात
कुकी दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. अंदाधुंद गोळीबार
आणि ड्रोनने बॉम्ब हल्ला केला असून अचानक झालेल्या या
हल्ल्यामुळे दहशत पसरली आणि जीव वाचवण्यासाठी नागरिकांची
पळापळ झाली. या दुर्दैवी हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून
9 जण जखमी झाले आहेत. इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कौत्रुक
परिसरात कथित कुकी अतिरेक्यांनी हल्ला केला. कोत्रुक गावच्या पंचायत
अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास
सशस्त्र दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यावेळी गावातील स्वयंसेवक
संवेदनशील भागात नव्हते. अतिरेक्यांनी केलेल्या जोरदार गोळीबारामुळे
अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. गोळीबार आणि बॉम्बस्फोट सुरू झाले
तेव्हा गावकरी आपापल्या घरात होते. या हल्ल्याबाबत मणिपूर पोलिसांनी
दिलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. कुकी अतिरेक्यांनी हायटेक
ड्रोनचा वापर केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अशा ड्रोनचा वापर फक्त
युद्धातच होतो. या ड्रोनद्वारे हल्ला करण्यासाठी उच्च प्रशिक्षित आणि तांत्रिक
तज्ञ असणे आवश्यक आहे. या संपूर्ण घटनेत मोठे षडयंत्र असण्याची
शक्यता नाकारता येत नाही,असा दावा पोलिसांनी केलाय.
Read also: https://ajinkyabharat.com/maharajas-effigy-was-not-broken-or-broken-in-malvan-sanjay-raut/