जबलपूर दुसरे तर आग्रा तिसऱ्या स्थानावर
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने शनिवारी जयपूर येथे ‘स्वच्छ हवा
आंतरराष्ट्रीय दिवस’ स्मरणार्थ राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले
Related News
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
होते, ज्यात स्वच्छ हवा सर्वेक्षण 2024(Clean Air Quality
Ranking) दरम्यान ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा शहरे’ पुरस्कार प्रदान
करण्यात आले. या अंतर्गत 10 लाखांहून अधिक लोकसंख्या
असलेल्या शहरांमध्ये सुरतला अव्वल, जबलपूरला दुसरे आणि
आग्राला तिसरे स्थान मिळाले आहे.
तर, तीन लाख ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये
फिरोजाबाद (उत्तर प्रदेश), अमरावती (महाराष्ट्र) आणि झाशी
(यूपी) ही शहरे सर्वोत्तम मानली गेली. तर तीन लाखांपेक्षा कमी
लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये रायबरेली (उत्तर प्रदेश),
नलगोंडा (तेलंगणा) आणि नालागढ (हिमाचल प्रदेश) ही शहरे
पहिल्या क्रमांकावर आहेत. ‘स्वच्छ हवा सर्वेक्षण’ हा शहरी कृती
योजनेअंतर्गत मंजूर उपक्रमांच्या अंमलबजावणीच्या आधारे आणि
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) अंतर्गत समाविष्ट
असलेल्या शहरांमधील हवेच्या गुणवत्तेवर आधारित शहरांची
क्रमवारी लावण्याचा एक उपक्रम आहे.
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी विविध सर्वोत्तम पद्धतींद्वारे हवेच्या
गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा केल्याबद्दल या शहरांना पुरस्कार
देण्यात आला. यात रस्ते पक्के करणे, यांत्रिक साफसफाईला
चालना देणे, जुन्या कचऱ्याचे बायोरिमेडिएशन, घनकचरा
व्यवस्थापन, डंपसाइट्स असलेल्या जमिनीचे स्वच्छ जागेत रूपांतर
करणे, हरित पट्टा विकास, वाहतूक व्यवस्थापन प्रणाली आणि
मियावाकी वनीकरण यांचा समावेश आहे. भारताने 2019 मध्ये
राष्ट्रीय स्वच्छ वायु सर्वेक्षण (NCAP) लाँच केला. ज्यामध्ये
2024 पर्यंत प्रदूषण 2030 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/amit-shahs-mumbai-visit-publicity-campaign-likely-to-burst/