जामनी: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वात मोठी
कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या हिंगणघाट येथे धान्याची व
सोयाबीनची काही मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. पण
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
इतर धान्याची विशेष आवक नाहीत, हे मात्र तितकेच खरे. शेतकरी
ही सोयाबीन विकून दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत आहेत
पण, चांगला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार
आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच
मेटाकुटीला आला आहे, शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या उत्पादनातून
शिल्लक राहिलेले काही धान्य, कडधान्य साठवून ठेवले होते. पण
निसर्गाच्या अनियमितपणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या
लागवड खर्चासाठी घरी साठवून ठेवलेले उत्पादन मिळेल त्या भावात
विकावे लागले. यामुळे आता दिवाळी सण तोंडावर आला असताना
बाजार समितीत धान्याची आवक दिसून येत नाही. आता शेतकऱ्यांना
नव्या सोयाबीनवरच अवलंबून राहावे लागत आहे. यंदा ऑक्टोबर महिना
अर्धा उलटून गेला तरी वरुणराजा शांत व्हायचे नाव घेत नसल्याने सोयाबीन
उत्पादकांना सोयाबीनचे उत्पादन घरी आणण्यासाठी तारेवरची कसरत
करावी लागत आहे. हल्ली जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे सोयाबीन सवंगणीला
आले आहेत. तर ज्यांचे सोयाबीन मळणीला आले आहे त्यांना वरुणराजा
सतावत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/teesri-aghadi-150-jaga-ladhanar/