हजारो टन फळे, भाजीपाला आणि रोकड जळून खाक
सीकर (राजस्थान) – सीकर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत (कृषी मंडी)
सोमवारी रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.
Related News
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोट बस स्टॅन्ड परिसरात घडलेले चोरीचे ०४ गुन्हे महिला आरोपी कडुन उघडकीस
अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; “बांगलादेशी” ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी
भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप
काटेपूर्णा धरणाची जलपातळी दीड फूट वाढली;
घोडेगाव येथे तेरवीच्या दिवशी संपूर्ण गाव स्वच्छ करून वडिलांना आगळी वेगळी श्रदांजली
दानापूर येथे लईत यात्रा महोत्सव साजरा.
ही आग विद्युत वाहिनी तुटून पडल्याने लागली असून, त्यामध्ये फळे,
भाज्या, दुकानातील रोकड आणि गोदाम पूर्णतः जळून खाक झाले आहेत.
दोन तास उशीराने पोहोचली फायर ब्रिगेड, दुकानदार हतबल
सीकरचे व्यापारी रामचंद्र सैनी यांनी सांगितले की, रात्री सुमारे १२:३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.
“माझ्या दुकानात ठेवलेली फळे, भाज्या आणि रोकड माझ्या डोळ्यांदेखत जळून खाक होत होती आणि मी काहीच करू शकत नव्हतो,”
असे त्यांनी सांगितले. रामचंद्र यांनी तात्काळ फायर ब्रिगेडला सूचना दिली,
मात्र सुमारे दोन तासांनी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली.
तोपर्यंत आगीने संपूर्ण मंडी व्यापली होती.
१२ फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी तब्बल अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली.
वीज विभागाच्या हलगर्जीपणामुळे व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
मंडीतील व्यापाऱ्यांच्या मते, आगीसाठी वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांची दुर्घट हलगर्जी जबाबदार आहे.
सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास वीज कर्मचाऱ्यांनी खराब झालेली लाईन बदलण्याऐवजी तीच जुन्या तऱ्हेने जोडली.
व्यापाऱ्यांनी त्यांना नविन लाईन टाकण्याची विनंती केली होती, पण कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले.
रात्री याच जागेवरून वीज वाहिनी तुटून खाली पडली. त्याठिकाणी फळे,
भाज्या आणि प्लास्टिक क्रेट्स ठेवलेले होते, ज्यामुळे लगेचच आग लागली आणि ती संपूर्ण मंडीमध्ये पसरली.
आगेमुळे जयपूर-सीकर हायवेवर वाहतूक ठप्प
कृषी मंडीमध्ये लागलेल्या आगीमुळे जयपूर-सीकर हायवेवर वाहतूक कोंडी झाली होती.
घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
प्रशासन आणि पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
Read Also : https://ajinkyabharat.com/hanuman-jayantinimit-chhora-dharma/