हजारो टन फळे, भाजीपाला आणि रोकड जळून खाक
सीकर (राजस्थान) – सीकर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत (कृषी मंडी)
सोमवारी रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.
Related News
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
अकोला शहरात सार्वजनिक भीम जयंती समितीतर्फे रॅलीचे भव्य आयोजन; निळ्या भीमसागराची उसळ
ही आग विद्युत वाहिनी तुटून पडल्याने लागली असून, त्यामध्ये फळे,
भाज्या, दुकानातील रोकड आणि गोदाम पूर्णतः जळून खाक झाले आहेत.
दोन तास उशीराने पोहोचली फायर ब्रिगेड, दुकानदार हतबल
सीकरचे व्यापारी रामचंद्र सैनी यांनी सांगितले की, रात्री सुमारे १२:३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.
“माझ्या दुकानात ठेवलेली फळे, भाज्या आणि रोकड माझ्या डोळ्यांदेखत जळून खाक होत होती आणि मी काहीच करू शकत नव्हतो,”
असे त्यांनी सांगितले. रामचंद्र यांनी तात्काळ फायर ब्रिगेडला सूचना दिली,
मात्र सुमारे दोन तासांनी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली.
तोपर्यंत आगीने संपूर्ण मंडी व्यापली होती.
१२ फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी तब्बल अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली.
वीज विभागाच्या हलगर्जीपणामुळे व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
मंडीतील व्यापाऱ्यांच्या मते, आगीसाठी वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांची दुर्घट हलगर्जी जबाबदार आहे.
सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास वीज कर्मचाऱ्यांनी खराब झालेली लाईन बदलण्याऐवजी तीच जुन्या तऱ्हेने जोडली.
व्यापाऱ्यांनी त्यांना नविन लाईन टाकण्याची विनंती केली होती, पण कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले.
रात्री याच जागेवरून वीज वाहिनी तुटून खाली पडली. त्याठिकाणी फळे,
भाज्या आणि प्लास्टिक क्रेट्स ठेवलेले होते, ज्यामुळे लगेचच आग लागली आणि ती संपूर्ण मंडीमध्ये पसरली.
आगेमुळे जयपूर-सीकर हायवेवर वाहतूक ठप्प
कृषी मंडीमध्ये लागलेल्या आगीमुळे जयपूर-सीकर हायवेवर वाहतूक कोंडी झाली होती.
घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
प्रशासन आणि पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
Read Also : https://ajinkyabharat.com/hanuman-jayantinimit-chhora-dharma/