मूर्तिजापूर: भारतीय संविधानाला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असून, देशभरात भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे.
या महोत्सवानिमित्त, श्री नारायण बहुउद्देशीय संस्था, खापरवाडा यांच्या वतीने “संविधानाचा जागर” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमा अंतर्गत मुर्तिजापूर तालुक्यातील नागरिकांमध्ये भारतीय संविधानाचा प्रचार, प्रसार आणि जनजागृती होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
तसेच, ग्रामीण भागातील तरुणांना भारतीय संविधान सहज उपलब्ध व्हावे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय,
जिल्हा परिषद शाळा, आणि पोलीस स्टेशनला संविधानाची प्रत भेटस्वरूपात प्रदान केली जाणार आहे.
“संविधानाचा जागर” या उपक्रमाची सुरुवात येत्या २६ जानेवारी २०२५ रोजी, प्रजासत्ताक दिनी, मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या अभिनव उपक्रमाद्वारे भारतीय संविधानाची जनजागृती आणि प्रचार-प्रसार संपूर्ण मुर्तिजापूर तालुक्यात करण्यात येईल.
संस्थापक अध्यक्ष सतिश गवई यांनी तालुक्यातील संविधानप्रेमी नागरिकांना या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
“संविधानाचा जागर” हा उपक्रम संविधानाच्या महत्त्वाची जाणीव करून देण्यासाठी आणि त्याचा प्रसार करण्यासाठी एक आदर्श पाऊल ठरेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also :https://ajinkyabharat.com/13-year-old-young-mulichaa-vinaybhang/