लोणार – प्रतिनिधी
दिनांक – १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अँड. दीपक मापारी यांच्याजागी राजेश बुधवत यांची तालुका प्रमुखपदी अचानक झालेली नियुक्ती ही केवळ एक साधी संघटनात्मक फेरबदल नसून, पक्षातील अंतर्गत राजकीय संघर्षाचा परिपाक मानली जात आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने विधानसभेसाठी सिद्धार्थ खरात यांना उमेदवारी मिळाल्यानंतर, तालुक्यातील संघटनात्मक व्यवस्थापनात मोठी विस्कळीतता निर्माण झाली. अँड. दीपक मापारी हे त्या वेळी तालुका प्रमुखपदी कार्यरत असतानाही त्यांना पक्ष उमेदवाराने पुरेसा सन्मान दिला नाही, ही नाराजी त्यांच्या भूमिकेतून दिसून आली. परिणामी, शिवसेनेच्या (उबाठा) गोटात खरात समर्थक आणि मापारी समर्थक असे दोन गट स्पष्टपणे उभे राहिले.
या दोन गटांतील संघर्ष विधानसभेच्या आधीपासूनच स्पष्ट होता. अँड. मापारी यांनी विरोधी गटाचे नेतृत्व करत, सिद्धार्थ खरात यांच्या विरोधात आवाज उठवला. त्यांच्या या भूमिकेमुळेच पुढे पक्षातील गटबाजी तीव्र झाली. खरात यांनी आपले राजकीय वजन वापरून मापारी यांना हटवण्यास यश मिळवले असले तरी त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
Related News
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
दहीहंडा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून यामुळे
नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याची दुरवस्था पाहता सामाजिक कार्यकर्ते प...
Continue reading
अकोला जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा रिमझिम पावसाने
हजेरी लावली असून या रिमझिम पावसातही शेतीच्या मशागतीचे काम सुरू असल्याचे चित्र प...
Continue reading
हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, शिंदे गटाच्या उदयानंतर शिवसेनेच्या (उबाठा) तालुका संघटनेला पुन्हा उभारी देण्याचे श्रेय अँड. मापारी यांनाच जाते. त्यांनी नव्या तरुण कार्यकर्त्यांना सोबत घेत पक्षाची पुनर्बांधणी केली. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जनमत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला आणि त्यांनी संघटनेपासून अलिप्तता पत्करली.
आता त्यांच्याजागी राजेश बुधवत यांची नेमणूक करण्यात आली आहे. बुधवत यांना संघटनात्मक अनुभव असला तरी पक्षातील अंतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर त्यांना नेतृत्व स्वीकारताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मापारी समर्थक कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे आणि पक्षातील गटबाजी कमी करणे, हे त्यांच्यासमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.
आगामी नगरपालिका , जिल्हापरिष आणि पंचायत समित्यांच्या होऊ घातलेल्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (उबाठा) गोटातील ही फूट पक्षासाठी घातक ठरू शकते. जर नेतृत्वाने योग्य वेळेत समेट साधला नाही, तर कार्यकर्त्यांचा पक्षांतराचा ओघ अधिक वाढू शकतो. त्यामुळे हे नेतृत्वबदल पक्षासाठी वरदान ठरेल की अभिशाप, हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल.