राज्य सरकारने काही दिवसांआधी ‘लाडकी बहीण योजना’ जाहीर
केली. या योजनेचा लाखो महिलांनी लाभ देखील घेतला आहे. अनेक
महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाले आहेत. याच योजने
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
वरून विरोधी पक्ष मात्र सरकारला घेरत आहे. 1 हजार 500 रुपये
देण्यापेक्षा सरकारने बहिणींची अब्रु वाचवावी, अशा शब्दात शरद पवार
यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे
गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.
संजय राऊतांनी नरेंद्र मोदी यांचं नाव घेत निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधल्या ‘लाडली बहन’ योजनेला बोगस
बोलले होते. तेच भाषण महाराष्ट्रात ऐकवा. हे डबल स्टॅंडर्डचे लोक आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या मानसिक संतुलनाबाबत आम्हाला चिंता लागली आहे.
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना योग्य मग झारखंडमध्ये योजना बोगस
कशी? हे भाजपच्या लोकांचं सडक डोकं आहे. मी पंतप्रधानपदाचा अपमान
करत नाही. पण मोदींचं हे विधान आहे, असं संजय राऊत म्हणाले.
राज्यात निवडणुका कधी होणार हे एकनाथ शिंदे ठरवणार नाहीत. तर
निवडणूक आयोग सांगेल. मोदी- शहांच्या आदेशानंतर निवडणुक आयोग
निवडणुका जाहीर करेल. भाजपच्या सांगण्यानुसार निवडणुका होणार आहेत.
राज्यातील 14 प्रमुख महापलिकांच्या निवडणुका होत नाहीयेत. या निवडणुका
तेव्हाच होतील, जेव्हा त्यांना विश्वास येईल. शिंदेंनी निवडणूक आयोगाचा पदभार
घेतला आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.