शरद पवारांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं तर मुख्यमंत्र्यांनी आत्मपरीक्षण!!

शरद पवार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटीमध्ये

मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत.

Related News

आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे.

एकीकडे हे उपोषण सुरु असतानाच

नाशिक मधील सकल मराठा समाजाने

पत्रकार परिषद घेऊन

शरद पवारांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं अशी मागणी केली आहे.

सकल मराठा समाजाचे नाशिकमधील समन्वयक करण गायकर

यांनी पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील

वेगवेगळ्या मुद्द्यांसंदर्भात भाष्य करताना

शरद पवारांनी ठरवल्यास समाजाला आरक्षण मिळेल असं म्हटलं आहे.

शरद पवार यांनी जर आमच्या आरक्षणासाठी पुढाकार घेऊन मार्ग सोडवला

तर आम्ही आपल्यासोबत राजकीयदृष्ट्या सक्रिय राहू, असे सकल मराठा समाजाने म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदारांना

मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

“राजकारणात पक्ष फुटल्यानंतर महाविकास आघाडीला सोबत घेऊन

स्वत:ला चाणक्य सिद्ध करणारे या देशाचे नेते शरद पवारांना स

कल मराठा समाजाची विनंती आहे की त्यांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं.

त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राजकीय पक्षाच्या नेत्यांना घेऊन अंतरवलीला जावे.

मराठा समाजाच्या मागण्याबाबत नेतृत्व करावे कारण

समाजात शरद पवारांचे स्थान वेगळे आहे.

तुम्ही ठरवलं तर समाज आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही.

शरद पवारांनी मराठ्यांना न्याय मिळवून द्यावा,

असं झालं तर समाज तुमच्या राजकणारणात सोबत राहील,”

असं सकल मराठा समाजाने शरद पवारांकडे मागणी करताना म्हटलं आहे.

तसेच पुढे बोलताना,

“असे झाले नाही तर सगळ्या राजकीय पक्षांच्या घरासमोर

थाळी नाद आंदोलन केलं जाईल आणि

पहिलं आंदोलन शरद पवार यांच्या घरासमोर करू.

ते अशी वेळ येऊ देणार नाही अशी आम्हाला खात्री आहे,”

असंही मराठा समाजाने म्हटलं आहे.

सरकारने जरांगे पाटील यांना फसवलं असून

सगेसोयरे या मुद्द्यावरून मराठा समाजाची फवणूक झाली आहे.

लोकसभेत मराठा समाजाचा फटका बसलाय की नाही

याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आत्मपरीक्षण करावे.

आमच्या मागण्यांचा विचार करावा, अजूनही वेळ गेली नाही,

असेही त्यांनी सदर पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

Read also : मोदी सरकारचं खातेवाटप, पहा कोणत्या मंत्र्याला कोणत खात.. (ajinkyabharat.com)

Related News