मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचा सल्ला
मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कारण राजकाणातील चाणाक्य अशी ओळख असलेले राष्ट्रवादी
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा
सोडवण्यासाठी लक्ष घातले आहे. ‘मराठा अरक्षणासाठी ओबीसी समाजात
नाराजीचे सूर आहेत. त्यामुळे दोन्ही समाजातील नेत्यांना एकत्र आणून
एक बैठक घ्यावी असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
महत्त्वाचे म्हणजे त्यांनी सर्वपक्षीय बैठक घेण्याचा सल्ला दिला आहे.
दोन समाजामध्ये कटुता निर्माण होणार नाही, यादृष्टीने पावलं टाकली पाहिजे.’
असेही त्यांनी सुचवले आहे.
प्रसार माध्यामांशी बोलाना शरद पवार यांनी म्हटले की, ‘नुकतीच मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावावी.
आम्हीही उपस्थित राहू, आमची भूमिका असेल. मला खात्री आहे की
मुख्यमंत्री सर्वपक्षीय बैठक बोलावतील. केंद्रात 50% पेक्षा जास्त आरक्षण
देण्याचा अधिकार आहे. जर त्यांनी या समस्येकडे सकारात्मक पाऊल उचलले
तर आम्ही त्यांना सहकार्य करू.’, असे शरद पवार म्हणाले.
नुकतीच पुण्यात त्यांची पत्रकारपरिषद पार पडली. त्यात ते बोलत होते.
‘राज्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनावर नेत्यांनी भूमिका मांडावी,
अशी मागणी आंदोलक आणि विरोधी पक्षांकडून होत आहे.
राज्यातील सामाजिक परिस्थिती बिघडू नये यासाठी सर्व चितेत आहेत.
राज्यात 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देता येत नाही. यासाठी सर्वांनी मिळून
केंद्र सरकारकडे आपली भूमिका मांडली पाहिजे. केंद्र सरकारने आरक्षणाबाबतची भूमिका
घेतल्यास त्याला आमचं समर्थन असेल’, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
Read also: https://ajinkyabharat.com/us-conspiracy-to-oust-mala-sattetoon-sheikh-hasina/