“बदलापूरमधील सगळ्या आंदोलकांवर दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल
केले. त्यांनी कायदा हातात घेतला म्हणून. त्यांनी कायदा हातात
घेतला नव्हता. आरोपीला शिक्षा व्हावी अशी मागणी होती. ज्याचं
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
एन्काऊंटर केलं तो आणि संस्था चालक असं मोठ सर्कल आहे.
एकाच आरोपीला अटक केली. आंदोलकांच्या घरात घुसून धिंड
काढली. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले” असं संजय राऊत म्हणाले.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात ते बोलत होते. “एन्काऊंटर खरं
की, खोटं हे जनतेला माहित आहे. ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल
केले, ते आधी मागे घ्या. आरोपीच्या हाताता बेड्या आहेत.
आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे. तरी सुद्धा कल्याण जंक्शनला
आरोपी पोलिसांची बंदूक खेचून गोळीबार करतो. संडास साफ
करणारा पोरगा गोळ्या कधी चालवायला लागला. त्याला तुरुंगात
असताना गोळ्या चालवायचं ट्रेनिंग यांनीच दिलं का?” अशी टीका
संजय राऊत यांनी केली. “संस्थाचालक फरार आहे. आपटे,
कोतवाल, आठवले यांच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल केले. का
गुन्हे दाखल केले? आम्ही सांगितलेलं का? तुम्ही गुन्हे दाखल केले,
त्यांना अटक का होत नाही?” असा सवाल संजय राऊत यांनी
विचारला. “माझ्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या आरोपीने
त्याच्या स्टेटमेंटमध्ये काही भयंकर खुलासे केले आहेत. ते समोर
येऊ नये, म्हणून त्यांनी मुळापासून हे सर्व संपवलं” असा दावा
संजय राऊत यांनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/or-run-away-from-rain-orange-alert/