यंदा 8 ते 10 दिवस आधी होणार बोर्डाच्या परीक्षा
महाराष्ट्रातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी
एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
Related News
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
१७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
अकोट : मच्छीसाथ परिसरात बस व मोटारसायकलचा भीषण अपघात —
१०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी — एएनएम कोर्ससाठी १० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
दुनियातील सर्वात उंच चिनाब ब्रिज वर तिरंगा फडकावत PM मोदी; चीन-पाकिस्तानला ठाम संदेश
आमदार अमोल मिटकरी त्यांच्या निवासस्थानी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
अकोल्याच्या आळंदा ग्रामपंचायतीचा पुढाकार जिल्हा परिषद च्या शाळेत प्रवेश घेणाऱ्यासाठी करमाफीची घोषणा.
कापशी रोडवरील वादळी वाऱ्यामुळे बाबळीच मोठं झाड कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही.
ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोटमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई;
अकोट येथील मंडळ अधिकाऱ्यावर प्राण घातक हल्ला
बुलडाणा अर्बन अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन.
मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे.
तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे याबाबत
प्रसिद्धी पत्रक जारी करत माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे,
नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक,
लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात
आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडयात
आयोजित केल्या जातात. सदर परीक्षांचा ऑनलाईन निकाल अनुक्रमे मे अखेरीस
आणि जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येतो.
त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी
जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवडयापासून घेतली जाते.
विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे,
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर
आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना
पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे,
या बाबींचा सारासार विचार करता येत्या २०२५ ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी
इ.१२ वी आणि इ.१०वीची परीक्षा नेहमीपेक्षा ८ ते १० दिवस आधी
आयोजित करण्याचा मंडळाचा मानस आहे. त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक
आणि इतर परीक्षा ठरलेल्या तारखांना घेण्याचे नियोजित आहे, असं मंडळाने म्हटलं आहे.