पातूर शहरातील सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने
शिवजयंतीचा सुवर्णमुहूर्त साधत नागरिकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती मोहीम राबवली.
अपघातांमुळे होणारी जीवितहानी आणि त्याचा संपूर्ण कुटुंबावर होणारा परिणाम लक्षात घेऊन,
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
विद्यालयाने मासिक सभेत ठराव घेतला की, संस्थेशी जोडलेल्या प्रत्येक शिक्षक,
शिक्षकेतर कर्मचारी आणि सदस्यांनी घरा बाहेर पडताना हेल्मेट वापरण्याचा संकल्प करावा.
रस्ते अपघात कोणतीही पूर्वसूचना न देता घडतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात हानी होते.
त्यामुळे हेल्मेट परिधान करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून,
आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे. या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत,
सावित्रीबाई फुले विद्यालयाने नागरिकांसाठी प्रेरणादायी पाऊल उचलले आहे.
या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, पातूर तालुक्यातील नागरिकांनी
यापासून प्रेरणा घेत हेल्मेट वापरण्याची सवय लावावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.
सुरक्षित वाहतुकीचा संदेश देणारी ही मोहीम भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/chhawa-india-pak-samanyacha-bata-sunday-insicor-earnings-lack/