पातूर शहरातील सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने
शिवजयंतीचा सुवर्णमुहूर्त साधत नागरिकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती मोहीम राबवली.
अपघातांमुळे होणारी जीवितहानी आणि त्याचा संपूर्ण कुटुंबावर होणारा परिणाम लक्षात घेऊन,
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
विद्यालयाने मासिक सभेत ठराव घेतला की, संस्थेशी जोडलेल्या प्रत्येक शिक्षक,
शिक्षकेतर कर्मचारी आणि सदस्यांनी घरा बाहेर पडताना हेल्मेट वापरण्याचा संकल्प करावा.
रस्ते अपघात कोणतीही पूर्वसूचना न देता घडतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात हानी होते.
त्यामुळे हेल्मेट परिधान करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून,
आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे. या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत,
सावित्रीबाई फुले विद्यालयाने नागरिकांसाठी प्रेरणादायी पाऊल उचलले आहे.
या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, पातूर तालुक्यातील नागरिकांनी
यापासून प्रेरणा घेत हेल्मेट वापरण्याची सवय लावावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.
सुरक्षित वाहतुकीचा संदेश देणारी ही मोहीम भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/chhawa-india-pak-samanyacha-bata-sunday-insicor-earnings-lack/