पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये अरबी समुद्रात छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे जलपूजन केले होते. परंतु
अजूनही त्या स्मारकाचे काम सुरु झाले नाही. त्यामुळे छत्रपती
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
शिवाजी महाराज यांचे वशंज आणि स्वराज्य पक्षाचे नेते
संभाजीराजे संतप्त झाले आहे. त्यांनी रविवारी अरबी समुद्रात
जाऊन स्मारकाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रात
आणि राज्यात तुमचे सरकार मग स्मारक का होत नाही? सरदार
पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा अजून का उभा
राहिला नाही? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहे.
कोणत्याही प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन होते तेव्हा सर्व
परवानग्या असणे गरजेचे होते. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी
महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी करोडो रूपये खर्च केले गेले.
मग कुठे आहे हे स्मारक? त्यामुळे आम्ही स्मारकाच्या शोधासाठी
मोहीम आम्ही काढली आहे. राज्यातील १३ कोटी जनतेला
सरकारने उत्तर द्यावे. आम्ही कायदा हातात घेणार नाही, असे
छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले. स्मारकाच्या ठिकाणी असलेले
आमचे बोर्ड काढून टाकले आहेत. परंतु महायुतीचे बोर्ड तसेच
आहेत. आम्ही समुद्रात स्मारकाच्या पाहणीसाठी जाणार आहोत.
परंतु ज्या बोटने जाणार आहोत, त्या बोटवाल्यांना भाजपकडून
धमक्या दिल्या जात आहेत. त्यांना परवाना रद्द करण्याची धमकी
दिली गेली आहे. मी वेळो वेळी स्मारकाबाबत भुमिका मांडली
आहे. मुंबई मनपाची निवडणूक असताना भाजपाने जलपुजन
करून तेव्हा राजकारण केले होते, असा आरोप संभाजीराजे यांनी
केला.
Read also: https://ajinkyabharat.com/international-buyer-vidarbhat-prathamcha-vaigaon-haldichya-shetat/