भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे
न्यायाधीश सजीव खन्ना यांची निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ही घोषणा
Related News
धगधगत्या ट्रकनं हादरला महामार्ग, उसळला हाहाकार!
NCP Ajit Pawar गटाच्या अध्यक्षावर महिला छळप्रकरणी गुन्हा
रोहित शर्माच्या जागी साई सुदर्शनची एंट्री? इंग्लंड दौऱ्यासाठी संभाव्य युवा ओपनर
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
थोड्यावेळापूर्वी केली. मावळते सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड
यांनी मागच्या आठवड्यातच संजीव खन्ना यांचे नाव सुचविले
होते. त्यानंतर आता राष्ट्रपतींनी खन्ना यांच्या नावावर
शिक्कामोर्तब केले असून ११ नोव्हेंबर रोजी ते सरन्यायाधीश
पदाची शपथ घेतील. चंद्रचूड यांच्यानंतर संजीव खन्ना हे सर्वात
वरिष्ठ न्यायाधीश आहेत. त्यांच्या काळात त्यांनी काही ऐतिहासिक
आणि महत्त्वाचे निकाल घेतले आहेत. मावळते सरन्यायाधीश
डीवाय चंद्रचूड यांनी मागच्या आठवड्यातच संजीव खन्ना यांचे
नाव सुचविले होते. त्यानंतर आता राष्ट्रपतींनी खन्ना यांच्या
नावावर शिक्कामोर्तब केले असून ११ नोव्हेंबर रोजी ते
सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. याच दिवशी विद्यमान
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचा कालावधी संपत आहे.
संजीव खन्ना यांचा जन्म १४ मे १९६० रोजी झाला असून सुमारे
चार दशकाहून अधिक काळ ते न्यायिक क्षेत्रात काम करत आहेत.
१९८३ साली दिल्ली बार कौन्सिलचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी
जिल्हा न्यायालय तीस हजारी कोर्ट नंतर दिल्ली उच्च न्यायालय
आणि विविध लवादांमध्ये वकिली केली. घटनात्मक कायदा, कर
आकारणी, विविध लवाद, व्यावसायिक कायदे, कंपनी कायदे
आणि पर्यावरण कायदे यासारख्या कायद्याच्या अनेक क्षेत्रात
त्यांनी यशस्वीरित्या वकिली केली.
Read also: https://ajinkyabharat.com/terrorist-attack-in-the-capital-of-turkestan/