शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांत टीका केली आहे.
शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी कृतज्ञता दाखवावी असे राऊत म्हणाले. त्यांनी शिंदेंच्या भाषेवर आणि मोदी-शहा यांच्या
आधारावर अवलंबून राहण्यावरून चिंता व्यक्त केली. राऊतांनी शिंदेंना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.
Related News
नवी दिल्ली | १४ मे २०२५ — पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या
ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर आता केंद्र सरकारने जागतिक स्तरावर दहशतवादाविरोधातील भूमिका मांडण्या...
Continue reading
क्वालालंपूर, मलेशिया | १७ मे २०२५ — महाराष्ट्रातील अकोला या छोट्याशा शहरातून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झेप घेत,
पूजा मेश्राम यांनी अकोल्याचे नाव जागतिक स्तरावर उज्वल केले आहे.
मल...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील आणि बाळापूर तालुक्यातील एक महत्त्वाचा रस्ता म्हणजे निंबा फाटा ते काजीखेळ मार्ग.
हा रस्ता अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असताना देखील याची ...
Continue reading
बाळापुर तालुक्यातील प्रत्येक गावातील भारत देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना बळ
मिळवण्यासाठी व त्यांनी नेमकेच झालेल्या पाकिस्तान मधील आतंकवादी यांना कथा स्थान व त्यांचा खात्मा
सिंदू...
Continue reading
मुंबई
राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. ‘माझे घर – माझे अधिकार’ या नव्या गृहनिर्माण
धोरणाला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत पुढील 5 वर्षा...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतातून निर्यात केलेल्या तब्बल चार कोटी 28 लाख रुपयांच्या आंब्यांना अमेरिकेने परत पाठवलं आहे,
आणि यामागचं कारण उघड होताच निर्यातदारांमध्ये खळबळ माजली आहे....
Continue reading
चंदीगड | प्रतिनिधी
पंजाब पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा आणि निर्णायक टप्पा ओलांडला आहे. पाकिस्तानसाठी
हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या अग्रस्थानी असलेले नेते मनोज जरंगे पाटील यांनी आज मंत्रीपदाची शपथ
घेतलेल्या छगन भुजबळांवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रात आजचा दिवस घातक ठरला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अपघातांच्या मालिकेत एकूण
आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झा...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (मंगळवार)
राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात सकाळी 10 वाजता
पार प...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने आज प्रलंबित मागण्यांकडे शासन-प्रशासनाचे
लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय काम बंद धरणे आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन जिल्...
Continue reading
अकोल्यातील बाळापूर तालुक्यातल्या गायगाव येथे मखदूम शाह बाबांच्या उर्स दरम्यान
जायरीनवर काही युवकांनी हल्ला केल्याची घटना घडली.
या प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गु...
Continue reading
एकनाथ शिंदे यांच्या जीवनामध्ये कृतज्ञता हा शब्द असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंशी कृतज्ञ असलं पाहिजे.
तुम्ही सोडून गेलात, तुमचे मतभेद झाले आहेत, तुम्ही आमच्यावर टीका करता,
आम्ही तुमच्यावर करतो,पण ज्या प्रकारची भाषा ते ( शिंदे) उद्धव ठाकरेंबद्दल
वापरता, त्यांनी स्वत:चं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ज्या दिवशी मोदी-शहांचं छत्र तुमच्यावर नसेल,
ते छप्पर उडेल तेव्हा तुम्ही कुठे असाल? हा विचार शिंदे आणि त्यांच्या लोकांनी केदारनाथच्या गुहेत
किंवा गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरांच्या गाभाऱ्यात बसून करायला हवा, अशा शब्दांत
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना थेट सुनावलं.
आज एकनाथ शिंदे हे स्वत:चं जे आर्थिक, सत्तेचं वजन दाखवत आहेत,
त्याचं मूळ उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उर्जेमध्ये आहे ना.
उद्धव ठाकरेंनी तुम्हाला उर्जा दिली नसती तर… ही अशी उर्जा त्यांना देऊ नका, हा माणूस घात
करेल हे सांगणारे लोकं आज त्यांच्याच ( शिंदेच्या) अवतीभवती आहेत ठाण्यातले.
ठाण्यात जे आमदार , खासदार आहेत ना आसपासचे, हे सगळे उद्धव ठाकरेंना ‘मस्के’ लावायला आले होते,
असे म्हणत राऊतांनी निशाणा साधला. साहेब हे करू नका, हा माणूस ( शिंदे) तुम्हाला दगा देईल,
याची नियत चांगली नाही, हे सांगणारे लोकंच आज त्यांच्या भोवती आहेत.
आम्ही त्याला साक्षीदार आहोत, असा दावा करत एकनाथ शिंदेंनी जपून पावलं टाकावी, असेही राऊत म्हणाले.
राज्यकर्त्यानं जर टीका सहन केली तर तो दोन पाऊल पुढं जातो , आणि विशेषत:
ज्याने आपल्यावर सुरूवातीच्या काळापासून मेहेरबानी केली आहे, भरभरून दिलं आहे,
त्याच्याबाबतीत जपून केलं पाहिजे.
छगन भुजबळांनी ते पथ्य पाळलं होतं,गणेश नाईक यांचं मी कौतुक करतो, त्यांनीही पक्ष सोडल्यावर शिवसेना आणि
मा. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावर काहीच टिप्पणी केली नाही, कारण ते कृतज्ञ होते.
नाहीतर मोदी-शहा, फडणवीसांनी दारातही उभं केलं नसतं..
त्यांनी ( ठाकरे कुटुंबाने) तुम्हाला दिलं म्हणून तुमची आज किंमत वाढली ना,
नाहीतर मोदी-शहांनी आज तुम्हाला विचारलंही नसतं. मोदी, शहा आणि फडणवीस तुम्हाला दारात उभं करणार नाहीत,
त्यांची नियत काय आहे हे मला माहीत आहे ना. शिवसेना फोडण्याची तुमची क्षमता होती
म्हणून तुम्हाला जवळ केलं. तुमच्यात फार मोठी कर्तबगारी आहे किंवा तुम्ही महाराष्ट्रासाठी,
देशासाठी फार मोठं सामाजिक कार्य केलं, म्हणून त्यांनी तुम्हाला ( शिंदे) आश्रय दिला नाही.
तुम्ही त्यांच आश्रित आहात कारण पैशांच्या ताकदीवर
तुम्ही शिवसेना फोडू शकलात म्हणूनच, अशी टीका राऊत यांनी केली.