महाराष्ट्रात एका नव्या राजकीय पक्षाचा उदय झाला आहे. विशेष
म्हणजे या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली असून
चिन्हंदेखील ठरलं आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या राजकीय
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
पक्षाचे नाव महाराष्ट्र स्वराज्य पक्ष असे आहे. हा पक्ष दुसऱ्या
तिसऱ्या कोणाचा नसून माजी खासदार छत्रपती संभाजीराजे
भोसले यांचा आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी नुकतंच फेसबुकवर
एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी याबद्दल संपूर्ण
माहिती दिली आहे. तसेच या पोस्टद्वारे संभाजीराजेंनी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याचेही
पाहायला मिळत आहे. दरम्यान आगामी विधानसभा
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ही मोठी
घोषणा केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी काही महिन्यांपूर्वी
स्वराज्य संघटना स्थापन केली होती. आता संभाजीराजे यांनी
निवडणूक आयोगाकडे त्यांच्या पक्षाची अधिकृतरित्या नोंदणी
केली आहे. “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” असे त्यांच्या पक्षाचे नाव
असणार आहे. तसेच सप्तकिरणांसह पेनाची निब असे त्यांचे
निवडणुकीचे चिन्ह असणार आहे. या पोस्टद्वारे त्यांनी ते आगामी
निवडणूक लढवणार असल्याबद्दलही घोषणा केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/murtijapurat-poetry-kalash-kavi-sammelanala-record-break-gardi/