महाराष्ट्रात एका नव्या राजकीय पक्षाचा उदय झाला आहे. विशेष
म्हणजे या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली असून
चिन्हंदेखील ठरलं आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या राजकीय
Related News
जय श्रीराम जय गोमाता | गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी, रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
आषाढी एकादशी विशेष बातमी | अकोला ३२० वर्षांच्या परंपरेचे साक्षीदार विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा | ९२ वर्षांची अखंड हरिनाम परंपरा
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
पक्षाचे नाव महाराष्ट्र स्वराज्य पक्ष असे आहे. हा पक्ष दुसऱ्या
तिसऱ्या कोणाचा नसून माजी खासदार छत्रपती संभाजीराजे
भोसले यांचा आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी नुकतंच फेसबुकवर
एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी याबद्दल संपूर्ण
माहिती दिली आहे. तसेच या पोस्टद्वारे संभाजीराजेंनी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याचेही
पाहायला मिळत आहे. दरम्यान आगामी विधानसभा
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ही मोठी
घोषणा केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी काही महिन्यांपूर्वी
स्वराज्य संघटना स्थापन केली होती. आता संभाजीराजे यांनी
निवडणूक आयोगाकडे त्यांच्या पक्षाची अधिकृतरित्या नोंदणी
केली आहे. “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” असे त्यांच्या पक्षाचे नाव
असणार आहे. तसेच सप्तकिरणांसह पेनाची निब असे त्यांचे
निवडणुकीचे चिन्ह असणार आहे. या पोस्टद्वारे त्यांनी ते आगामी
निवडणूक लढवणार असल्याबद्दलही घोषणा केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/murtijapurat-poetry-kalash-kavi-sammelanala-record-break-gardi/