वारंवार आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काल (गुरूवारी)
सांगलीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
तर गांधी-नेहरुंच्या विचारावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र
मोदी हे देव माणूस आहेत. त्यांनी 370 कलम रद्द केले, आता
पाकव्याप्त काश्मीर परत घेतील अशी आशा बाळगूया असं म्हणत
त्यांनी गांधी नेहरुंच्या विचाराने देशाचा नरक झाला आहे, म्हणत
त्यांनी हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देव माणूस
आहेत. मोदींच्यासारखे कणखर पंतप्रधान देशाला लाभले आहेत.
त्यांच्यामूळे काश्मिरमधील 370 कलम रद्द झाले आहे. आता ते
पाकव्याप्त काश्मीर परत घेतील अशी आशा बाळगूया असे
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. पेठ
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या
अनावरण कार्यक्रमात संभाजी भिडे बोलत होते. छत्रपती शिवाजी
महाराज व धर्मवीर संभाजीराजे यांचे विचार सोडून आपण गांधी –
नेहरुंचे विचार आत्मसात केल्याने देशाचा नरक झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देवमाणूस आहेत, त्यांच्या मातोश्रींचं कौतुक
करावं तितकं थोडं आहे. त्यांनी 370 कलम रद्द केलं. आता पाक
व्याप्त काश्मीर परत घेतील, असं म्हणत त्यांनी मोदींवर कौतुकांचा
वर्षाव केला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/two-agniveerans-died-in-nashik-while-loading-tophat-balls/