ब्रह्माकुमारी शाखा हिरपूरच्या वतीने महिलांच्या शक्तींचा सन्मान
व आदर करण्याकरता रोज त्यांचे पूजन करून सन्मान करण्यात
आला. नवरात्रीमध्ये सर्वत्र देवीच्या विविध रूपांचे पूजन करण्याचा
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
ऊत्साह असतो. स्त्री शक्तीची उपासना केल्यावर सत्याचा विजय,
अज्ञानावर ज्ञानाचा विजय, परंतु आपल्या घरातील, समाजातील
माता-भगिनीचा पाहिजे तितका आदर सन्मान केल्या जात नाही.
त्यांच्यातील शक्तींना महत्त्व दिले जात नाही. स्त्री मध्ये असलेल्या
अगाध शक्तीचा अविष्कार जगाला दाखवला पाहिजे. संयमी
असलेली स्त्री प्रसंगी किती बळकट होऊ शकते. आपल्यातील
शक्तींची ओळख व्हावी याकरता रोज महिला आणि मुलींना देवी
बनवून त्यांचे पूजन करण्यात आले तसेच दुर्गा, लक्ष्मी, काली,
सरस्वती, ब्रह्मचारिणी, भवानी, अन्नपूर्णा हे स्त्रीच्याच विविध
शक्तीचे रूप आहेत. देवीच्या विविध शक्तीचे महत्व रोज समजावून
सांगण्यात आले. चैतन्य देवी बनण्याकरता स्वाती राजगुरे छाया
गावंडे, सविता भालेराव, राशी गावंडे, अनिता हागे, शुभदा
कुलकर्णी, ऋतुजा भालेराव, रजनी बानूवाकोडे, किरण गुप्ता,
वैष्णवी गावंडे, आदिती कुलकर्णी, दिव्या बुधेकर, दिपाली गावंडे
यांनी सहभाग घेतला होता. शेवटच्या दिवशी सार्वजनिक नवदुर्गा
उत्सव मंडळाजवळ चैतन्य देवींना बसून सर्व भक्तांना आपल्या
घरातील व समाजात दिसणाऱ्या माता- भगिनीचा सन्मान करणे
हीच खरी पूजा आहे असे ब्रह्मकुमार प्रमोदभाई, राजेश भाई यांनी
सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोपानभाई,
गजाननभाई, बनारसेभाई, प्रविण ढगे यांनी परिश्रम घेतले.
Read also: https://ajinkyabharat.com/possibility-of-reduction-in-edible-oil-prices/