केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रातील आठ
शसकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. यामुळे
एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी ८०० जागा नव्याने वाढणार आहेत.
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
मान्यता दिलेल्या बहुतेक महाविद्यालयात पुरेसे अध्यापक नाहीत
तसेच इमारतीपासून हॉस्टिल सुविधा नसतानाही याबाबतच्या अटी
पूर्ण करण्याच्या हमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना
मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने यंदाच्या वर्षी मुंबई व
नाशिक येथे ५० प्रवेश क्षमता असलेल्या दोन वैद्यकीय
महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. आता नव्याने केंद्र सरकारने
आठ वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिल्यामुळे राज्यात आता
एकूण ४१ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये असतील. शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयांची सध्याची एकूण प्रवेश क्षमता ५०५०
एवढी असून नव्याने जागा वाढल्याने ती ५८५० एवढी होणार आहे.
अंबरनाथ, गडचिरोली, वाशीम, जालना, बुलढाणा, हिंगोली व
भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना १०० प्रवेश
क्षमतेसाठी मान्यता देण्यात देण्यात आली आहे. यापूर्वी राष्ट्रीय
वैद्यकीय आयोगाच्या तपासणीत या महाविद्यालयांमध्ये पुरसे
अध्यापक तसेच इमारतीसह आवश्यक सुविधा नसल्यामुळे
मान्यता नाकारण्यात आली होती. मात्र राज्यातील आगामी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने
अटींची पूर्तता करण्याच्या हमीवर या आठ महाविद्यालयांना
मान्यता दिली आहे. २०१९ मध्ये आर्थिकदृट्या मागासांना कोटा
निश्चित केल्यानंतर राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात
९५० जागांची भर पडली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी
राज्यात आठ वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली असली तरी
केंद्रीय वैद्यकीय आयोगाच्या २०२० च्या किमान पात्रता निकषांची
पूर्तता या महाविद्यालयांनी केलेली नाही. पुरेसे मुनष्यबळ व
अध्यापक नाहीत तसेच इनारतींसह पायभूत सुविधांचा अभाव
असून लवकरात लवकर या अटींची पूर्तता केली जाईल या हमीच्या
आधारे या महाविद्यालयांना ही मान्यता देण्यात आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/yanda-padnar-kadakyaachi-thandi/