राष्ट्रीय स्वयंसेवक दलाने जातीय जनगणना आणि महिला
सुरक्षेसारख्या संवेदनशील मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे.
समाजाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी जातीय
Related News
कापशी रोडवरील वादळी वाऱ्यामुळे बाबळीच मोठं झाड कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही.
ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोटमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई;
अकोट येथील मंडळ अधिकाऱ्यावर प्राण घातक हल्ला
बुलडाणा अर्बन अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन.
रिझर्व्ह बँकेने केली रेपो दरात कपात !
जेसीबी चालक तरुणाची गळफास लावून आत्महत्या
पावसाने विश्रांती घेतली असली तरी तो पुन्हा आपला जोर दाखवणार…
पातूरच्या माळराजुरा फाट्यावर बर्निंग ट्रकचा थरार
गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या कार्यालयात साजरा
अकोला- जिल्हा नियोजन समितीचा वाद
अवैध्य गौण खनिज विना रायल्टी वाहतूक प्रकरणी पातुर महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर पकडले
अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज भीषण अपघात
जनगणनेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंता व्यक्त केली आहे.
तर महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावलं उचलण्याची गरज व्यक्त
केली आहे. या विषयावर केरळच्या बैठकीत चर्चा करण्यात आली
आहे. तसेच इतर मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली असून महत्त्वाचे
निर्णय घेण्यात आले आहेत. जातीनिहाय जनगणना हा संवेदनशील
मुद्दा असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटलं आहे. जातीय
जनगणनानेमुळे समाजाच्या एकता आणि अखंडतेला धोका आहे,
असं संघाने म्हटलं आहे. तसेच समरसतेला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं
काम नेटानं पुढे नेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.
दलित समाजाची लोकसंख्या जाणून घेण्यासाठी सरकारने त्यांची
जनगणना केली पाहिजे, असं संघाचे अखिल भारतीय प्रचारक सुनील
आम्बेकर यांनी म्हटलं आहे. या बैठकीत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या
दुर्देवी घटनेवर विस्ताराने चर्चा करण्यात आली. यावेळी महिलांच्या
सुरक्षेसाठी कायद्यातील दुरुस्तीवर संघाने यावेळी जोर दिला.
गेल्यावर्षी संघाने राज्य आणि जिल्ह्यात 472 महिला संमेलनाचं आयोजन
करण्यात आलं होतं. त्यात स्त्रीयांचे मुद्दे, पाश्चात्य स्त्रीवाद आणि भारतीय
चिंतन यावर चर्चा करण्यात आली. बंगाल, वायनाड आणि तामिळनाडूतील
घटनांवर या बैठकीत गंभीरपणे चर्चा करण्यता आली. संघाने अहिल्याबाई
होळकर यांची 300 वी जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर सामाजिक परिवर्तनासाठी
काम करण्याची योजना आखण्यात आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/howl-of-rain-in-nanded-gavanna-purcha-vedha/