खुद्द आमदार रवी राणांच्या हस्ते झाली सुरुवात
बडनेरा मतदार संघातील गोर गरीब जनतेची दिवाळी आनंदात
साजरी व्हावी म्हणून दरवर्षी दिवाळीपूर्वी किराणा वाटप करणाऱ्या
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
आमदार रवी राणा यांनी कालपासून किराणा, लाडक्या बहिणीला
साडी व प्लेट वाटप सुरु केले असून आचारसंहितेच्या भीतीमुळे
हे वाटप लवकर सुरु झाल्याची शहरात चर्चा आहे. संपूर्ण बडनेरा
मतदरसंघांतील शहरी व ग्रामीण भागातील एक लाख कुटुंबियांना
हे वाटप करण्यात येणार आहे.
गोर गरिबांच्या जीवनात गोडवा निर्माण करण्यासाठी, त्यांना राखी,
गणपती, नवरात्री व दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी
हे वाटप मोफत घरपोच मिळणार आहे. काल किराणा वाटप अभियानाचा
प्रारंभ करताना प्रत्येक कुटुंबाला किराणा मिळेपर्यंत हे अभियान
पुढील दीड महिना सातत्याने सुरू राहील, असे आमदार रवी राणा
यांनी शुभारंभाला जाहीर केले. राणा यांचा हा उपक्रम गेल्या १५ वर्षापासून
सुरू असून यातच त्यांच्या यशाचे गमक असल्याचे बोलले जाते.
या किराणा बॅग मध्ये साखर, तेल, चणाडाळ, पोहे, सोयाबीन वडी
शेंगदाणे, मुरमुरे, मसाला पाकीट, मिठपुडा आदी साहित्य असणार आहे.
सोबतच साडी व प्लेटची त्यात लाडक्या बहिणींमुळे भर पडली आहे.
या वर्षी या उपक्रमाची सुरुवात पार्वती नगर पासून करण्यात आली
आपण आपले सामाजिक दायित्व जोपासण्यासाठी आणि प्रत्येक कुटुंबियांसोबत
असलेले आपुलकीचे नाते कायमस्वरूपी जोपासण्यासाठी हा उपक्रम
गेल्या १५ वर्षापासून राबवित असून भविष्यातही हा उपक्रम असाच सुरू
ठेवण्याचा आपला संकल्प असल्याचे आमदार रवी राणा यांनी या कार्यक्रमात
जाहीर केले. सर्व स्वाभिमानी शिलेदार अत्यंत नम्रपणे कुणाचाही आत्मसन्मान
न दुखावता घरपोच किराणा वाटप करीत आहेत, जवळपास १ हजार स्वाभिमानी
शिलेदार सेवाभावी वृत्तीने ४ गोडावून मध्ये शेकडो टन किराणा साहित्याचे
पॅकिंग अहोरात्र करीत असून ५०० स्वाभिमानी पदाधिकारी व कार्यकर्ते
कुठलाही भेदभाव न करता प्रत्येक लाभार्थी कुटुंबियांना घरपोच किराणा किट
देण्याचे कार्य करीत आहेत, असेही राणा यांनी या कार्यक्रमात सांगितले.
Read also: https://ajinkyabharat.com/storyteller-pradeep-mishras-program-canceled-due-to-rain/