अकोट
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी व आदिवासी बहुल भाग असलेले गट ग्राम पंचायत रामापूर
येथे शासनाने गेल्या २५ ते ३० वर्षा पासून लाखो रुपये खर्च करून तलाठी निवास कार्यालय बांधले आहे.
Related News
पातूर तालुक्यात वादळी वाऱ्याचा कहर – शिर्ला, गोळेगाव आणि चोंढी येथे पशुधनाचा मृत्यू
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अकोला दौऱ्यावर आहेत.
पत्नीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप; तक्रारदार गणेश ठाकरे यांचा पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप
विवाहितेला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल
मोदींच्या नेतृत्वाखालील ११ वर्षांचा यशस्वी प्रवास : देशात विकास, बदल आणि निर्णयांची अमृतयात्रा
अकोल्यातील बाळापूर शहरात आज झालेल्या दमदार पावसामुळे जन जीवन विस्कळीत
Bacchu Kadu Protest : चौथा दिवस अन्नत्यागाचा, कार्यकर्ते रस्त्यावर आक्रमक!
अकोला : विकास संवाद सभेत पावसाचे आगमन, नागरिकांत उत्साहाचे वातावरण!
युवासेनेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न
जुन्या काळातील मशीन गनने चीनचे फायटरक जेट पाडले; चीनची नामुष्की !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
पीओपी गणेशमूर्ती विसर्जनासाठी फडणवीस सरकार नवे धोरण आणणार!
मात्र तिथे कुठल्याही सोय सुविधा आज पर्यंत उपलब्ध करून दिल्या नसल्याने ते तलाठी निवास कार्यालय धूळख्यात पडलेले असल्याचे चित्र दिसत आहे.
त्यामुळे त्या तलाठी निवास कार्यालयाच्या आजूबाजूला गावातीलच काही लोकांनी इंधन, काळी कचरा, गुरेढोरे,
बकऱ्या बांधण्यासाठी खुठे रोवून अतिक्रमण केले आहे. या बाबत रामापूरचे तलाठी व गावातूनच या
अतिक्रमण बद्दल लेखी तक्रार सुध्दा करण्यात आली होती. या बाबत वेळोवेळी वृत्त प्रकाशित करण्यात आले होत.
त्या प्रमाणे ग्राम पंचायत यांनी दखल घेऊन संबंधित अतिक्रमण धारक यांना ग्राम पंचायत मार्फत नोटीसेस बजावून
आपआपले अतिक्रमण सात दिवसाच्या आत काढून मोकळे करावे अन्यथा आपल्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात
येईल याची नोंद घ्यावी असे कळविले होते. त्या वरून अतिक्रमण धारक यांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढून मोकळे केले होते.
मात्र या तलाठी निवास कार्यालयात लाईट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, टेबल, खुर्च्या, कोणत्याही सोय सुविधा
उपलब्ध नसल्याने तलाठी यांना कार्यालय उघडून हजर राहणे बाबत मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
म्हणूनच येथे तलाठी हजर राहत नसल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळेच तेथे वेळोवेळी अतिक्रमण सुध्दा होत आहे.
तरी शासनाने ताबडतोब दखल घेऊन रामापूर येथील तलाठी निवास कार्यालय समोरील अतिक्रमण ग्राम पंचायत यांना
काढून मोकळे करण्याचे आदेश द्यावे.व तेथे तात्काळ सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या.
म्हणजे जेणे करून तेथे तलाठी हे कार्यालय उघडून तेथे रुजू होतील व शेतकऱ्यांना,शेतमुजरांना,
शाळकरी विद्यार्थ्यांना लागणारे महत्वाचे कागदपत्र हे अकोटला न
जाता गावातिलच तलाठी निवास कार्यालयात उपलब्ध करून देतील अशी मागणी होत आहे.
रामापूर येथील तलाठी निवास कार्यालयाकडे शासनाचे दुर्लक्ष,सोईसुविधा उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी.
Read Also : https://ajinkyabharat.com/udya-chief-minister-devendra-fadnavis-o-akola-dahyawar/