राजेश्वर मंदिराच्या विकासावरून आरोप-प्रत्यारोप; भाजपाची आमदार पठाण यांच्यावर टीका

स्कूल ऑफ स्काॅलर शाळेतील मुख्याध्यापिकेने पालकांना टि. सी. साठी जेरीस आणले. अकोला:- स्थानिक स्कूल ऑफ स्काॅलर हिंगणा रोड कौलखेड अकोला या शाळेतील मुख्याध्यापिका पालकांना नेहमी च अपमानास्पद वागणूक देतात. या वेळी तर त्यांनी हद्दच केली एका विद्यार्थिनी ची टि. सी. त्यांनी रोखून ठेवली आहे. सदर विद्यार्थीनीच्या वडिलांनी दिनांक १३ जून रोजी मुख्याध्यापिका यांच्या कार्यालयात टि. सी. साठी अर्ज दाखल केला आहे. परंतु जवळ जवळ दोन आठवडे झालेत तरी मुख्याध्यापिका सौ. मनिषा उंबरकर यांनी सदर पालकांना टि. सी. दिली नाही व त्यासंबंधी कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. त्यांना वारंवार चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी कंटाळून पालकांनी सदर शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या विरोधात माध्यमिक शिक्षणाधिकारी अकोला यांच्या कडे लेखी तक्रार दाखल केली आहे. वास्तविक पाहता टि. सी. चा अर्ज दाखल केल्यानंतर सात दिवसांत टी सी. देणे बंधनकारक आहे. तरी सुद्धा सदर मुख्याध्यापिका यांनी या गोष्टी ची हेतूपुरस्कर दखल न घेता टि. सी. साठी पालकांना वेठीस धरले आहे. दुसऱ्या शाळेत प्रवेश नाही मिळाला तर विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाईल व त्या शैक्षणिक नुकसानास सर्वस्वी सदर मुख्याध्यापिका जबाबदार राहतील. आर. टि. ई. ॲक्ट नुसार मुख्याध्यापिका यांचे वर गुन्हा दाखल होऊ शकतो.

“खड्डे बुजवू शकले नाहीत, ते मंदिरासाठी काय निधी आणणार?” – गिरीश जोशी यांचा सवाल

अकोला | राजेश्वर मंदिराच्या ‘ब’ वर्ग दर्ज्यावरून अकोल्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी पश्चिम अकोल्याचे आमदार साजिद पठाण यांच्यावर टीकेची झोड उठवत म्हटलं आहे.

Related News

की, “जे अग्रसेन चौकातील खड्डे बुजवू शकले नाहीत, ते मंदिरासाठी काय निधी आणणार?”

पठाण यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून दिल्याचा दावा केला होता.

मात्र, जोशी यांनी हा दावा फेटाळून लावत याआधी आमदार रणधीर सावरकर यांनी दोन वर्षांपासून केलेल्या प्रयत्नांची आठवण करून दिली.

त्यांनी ५० लाखांचा निधी मंजूर करून प्रशासनात पाठपुरावा केल्याचा दावा भाजपाने केला.

जोशींचा सवाल: पठाण यांनी नेमका कुठून निधी आणला? कुठले दस्तऐवज दिले? जनतेसमोर खुलासा करा.

जोशी यांनी हेही नमूद केलं की, “हे सर्व केवळ स्वस्त प्रसिद्धीसाठी चाललेले राजकारण आहे.

” तसेच पठाण यांच्या लोकसभेतील जुन्या ‘विवादास्पद भाषणाची’ आठवणही त्यांनी करून दिली.

अकोल्यात राजेश्वर मंदिराच्या नावाने आता राजकीय श्रेय घेण्याची चढाओढ दिसत असून,

हा विषय सध्या शहरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/danapur-yehe-rajarshi-shahu-maharaj-jayanti-festival-concluded/

Related News