नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय लष्कराने राजस्थानच्या लाठी परिसरातून पाकिस्तानचा एक वैमानिक जिवंत पकडला आहे. हा वैमानिक पाकिस्तानच्या वायुदलातील असून तो JF-17 लढाऊ विमानात सवार होता. भारताने हे विमान पाडल्यानंतर वैमानिकाने आपले प्राण वाचवण्यासाठी आपत्कालीन पॅराशूटचा वापर केला. त्यानंतर तो लाठी परिसरात उतरला आणि तेथे भारतीय लष्कराच्या ताब्यात गेला.
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या या वैमानिकाला एका गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. अद्याप अधिकृतरीत्या त्याची ओळख उघड करण्यात आलेली नाही, मात्र तो पाकिस्तानच्या वायुदलातील वरिष्ठ अधिकारी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताची आक्रमक भूमिका
Related News
NEET Paper Leak : नीट पेपरफुटीवर पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय; प्रियंका गांधींचं थेट उत्तर, म्हणाल्या- ‘सोल्यूशन काढायचंच असेल तर...’
NEET Pape...
Continue reading
Gold Rate Today : सोन्याने पुन्हा घेतली भरारी! दरात मोठी वाढ, चांदीही महागली; आज 1 तोळा सोन्याचे दर किती?
Gold Rate Today 23 July 202...
Continue reading
CJP Protest : ‘धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल’; नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर CJPची थेट पोस्ट, आंदोलन सुरूच राहणार?
CJP Protest Delh...
Continue reading
Sameer Choughule : ‘मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर समाज दुर्धर आजारी’; समीर चौघुलेंचा संताप
Sameer Choughule News
Continue reading
CJP Protest : ‘जंतरमंतरवरच यावं लागेल, त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही’; आशुतोष रांका आक्रमक
CJP Protest Delhi : केंद्रीय शिक्षण मं...
Continue reading
Ashok Kharat : 100 रुपयांच्या चिंचोके 1 लाखांना विकल्याचा आरोप; अनुयायांच्या KYC कागदपत्रांचा गैरवापर, ईडीच्या आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे
Ash...
Continue reading
Mumbai Protest : पोलिसांनी आंदोलकांना वॅनमध्ये भरलं, एकाने गेट उघडलं अन् सगळे खाली उतरले; चेंबूरमधील VIDEO व्हायरल
Mumbai Protest Viral...
Continue reading
Delhi Protest : नवी दिल्लीत आंदोलनाचा भडका; 16 मेट्रो स्टेशन पुढील आदेशापर्यंत बंद, राजधानीत कडेकोट सुरक्षा
Delhi Protest News : नवी Delhi ...
Continue reading
Maharashtra Bandh : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद; प्रकाश आंबेडकरांकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक, साडेतीन हजार कार्यकर्ते ताब्यात
Continue reading
NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणी सरकारचे मोठे पाऊल; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश
C...
Continue reading
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस! पालघरमध्ये पूरस्थिती गंभीर, 16 गावांचा संपर्क तुटला; शाळांना सुट्टी, पुढील 48 तास धोक्याचे
Continue reading
CJP Protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज प्रकरणी दिल्ली पोलिसांना हाय कोर्टाची नोटीस; CCTV फुटेज जतन करण्याचे आदेश
कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनादरम्...
Continue reading
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या हल्ल्यात भारताचे २६ नागरिक शहीद झाले होते. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवादी तळांवर जोरदार हवाई हल्ले केले.
या हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी पाकिस्तानकडून भारतीय सीमांवर ड्रोन व मिसाईल हल्ले करण्यात आले. मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने हे सर्व हल्ले निष्फळ ठरवले. पाकिस्तानने भारताच्या विविध शहरांवर लढाऊ विमानांद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला, त्यातच एक JF-17 विमान भारतीय हद्दीत घुसले होते. त्याला भारताने वेळीच लक्ष्य करून पाडले आणि त्यातील वैमानिक जिवंत पकडण्यात यश मिळवले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त
भारत-पाकिस्तानमध्ये वाढत चाललेला तणाव पाहता संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिका व रशिया यांनी दोन्ही देशांनी संयम ठेवावा, असे आवाहन केले आहे. मात्र भारताने स्पष्टपणे म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोणताही तडजोड होणार नाही.
भारतीय लष्कर सध्या सर्व सीमेवर सज्ज असून पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रत्येक कारवायेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.