नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय लष्कराने राजस्थानच्या लाठी परिसरातून पाकिस्तानचा एक वैमानिक जिवंत पकडला आहे. हा वैमानिक पाकिस्तानच्या वायुदलातील असून तो JF-17 लढाऊ विमानात सवार होता. भारताने हे विमान पाडल्यानंतर वैमानिकाने आपले प्राण वाचवण्यासाठी आपत्कालीन पॅराशूटचा वापर केला. त्यानंतर तो लाठी परिसरात उतरला आणि तेथे भारतीय लष्कराच्या ताब्यात गेला.
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या या वैमानिकाला एका गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. अद्याप अधिकृतरीत्या त्याची ओळख उघड करण्यात आलेली नाही, मात्र तो पाकिस्तानच्या वायुदलातील वरिष्ठ अधिकारी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताची आक्रमक भूमिका
Related News
EPF Balance: व्याजाची रक्कम खात्यात जमा झाली की नाही? मोबाईलवरून 'या' 4 सोप्या पद्धतीने लगेच तपासा
EPF Interest Credit 2025-26: कर...
Continue reading
सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं, पण CJPचं आंदोलन सुरूच; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून सरकारची कोंडी कायम
सामाजिक कार्यकर्ते आणि शास्त्रज्ञ सोनम वा...
Continue reading
Share Market Crash: ट्रम्प यांच्या एका घोषणनेने जगाला हादरवले! भारतापासून युरोपपर्यंत शेअर बाजारात भूकंप, गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान
Sh...
Continue reading
ITR Filing: 31 जुलै, 31 ऑगस्ट की 31 ऑक्टोबर? तुमच्यासाठी ITR भरण्याची अंतिम मुदत कोणती, जाणून घ्या संपूर्ण माहिती
ITR Filing Deadline 202...
Continue reading
करिश्मा कपूरचा 44,840 कोटींच्या संपत्तीसाठी कोर्टात लढा; संजय कपूर यांच्या कंपनीचा निकाल जाहीर, नफ्यात तब्बल 45 टक्क्यांची वाढ
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा
Continue reading
गोड खायची इच्छा झालीये? बाजारातून मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरी काही मिनिटांत बनवा नारळाचे हे 4 चविष्ट पदार्थ
जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खावंसं वाटणं ही ...
Continue reading
Amit Thackeray : ‘तुम्ही तुमचं काम नीट केलं असतं तर आम्हाला रस्त्यावर उतरायची गरज पडली नसती’; अमित ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
विद्यार्थी आंदोलन, NEET पेपर...
Continue reading
Explained: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Gen Z स्टाईल व्हिडीओ का केला? 5 कारणं आली समोर; ‘मित्रों’ऐवजी ‘Friends’ म्हणण्यामागे काय?
PM Modi Viral...
Continue reading
राहुल गांधी आणि अभिजीत दिपके राजीनाम्यावर ठाम, विरोधक आक्रमक; NEET पेपरफुटीवरून संसदेची कोंडी कशी फुटणार?
Rahul Gandhi-Abhi...
Continue reading
कच्ची हळद म्हणजे आरोग्याचा खजिना! रोगप्रतिकारशक्तीपासून पचनक्रियेपर्यंत, जाणून घ्या या नैसर्गिक औषधी वनस्पतीचे फायदे
भारतीय स्वयंपाकघरात हळदीला केवळ मसाल...
Continue reading
उन्हामुळे आलेली टॅनिंग दूर करण्यासाठी मुलतानी माती आणि टोमॅटोचा फेस पॅक; घरच्या घरी असा करा वापर, त्वचेला मिळेल ताजेपणा
उन्हाळा सुरू झाला की कडक उन्हा...
Continue reading
मोठी बातमी! अभिजीत दिपकेसह CJP च्या सर्व सदस्यांना होणार अटक? कुणाचा दावा, कुणाचे इनपूट, एकच खळबळ
CJP Protest Abhijeet Dipke: दिल्ल...
Continue reading
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या हल्ल्यात भारताचे २६ नागरिक शहीद झाले होते. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवादी तळांवर जोरदार हवाई हल्ले केले.
या हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी पाकिस्तानकडून भारतीय सीमांवर ड्रोन व मिसाईल हल्ले करण्यात आले. मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने हे सर्व हल्ले निष्फळ ठरवले. पाकिस्तानने भारताच्या विविध शहरांवर लढाऊ विमानांद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला, त्यातच एक JF-17 विमान भारतीय हद्दीत घुसले होते. त्याला भारताने वेळीच लक्ष्य करून पाडले आणि त्यातील वैमानिक जिवंत पकडण्यात यश मिळवले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त
भारत-पाकिस्तानमध्ये वाढत चाललेला तणाव पाहता संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिका व रशिया यांनी दोन्ही देशांनी संयम ठेवावा, असे आवाहन केले आहे. मात्र भारताने स्पष्टपणे म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोणताही तडजोड होणार नाही.
भारतीय लष्कर सध्या सर्व सीमेवर सज्ज असून पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रत्येक कारवायेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.