नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय लष्कराने राजस्थानच्या लाठी परिसरातून पाकिस्तानचा एक वैमानिक जिवंत पकडला आहे. हा वैमानिक पाकिस्तानच्या वायुदलातील असून तो JF-17 लढाऊ विमानात सवार होता. भारताने हे विमान पाडल्यानंतर वैमानिकाने आपले प्राण वाचवण्यासाठी आपत्कालीन पॅराशूटचा वापर केला. त्यानंतर तो लाठी परिसरात उतरला आणि तेथे भारतीय लष्कराच्या ताब्यात गेला.
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या या वैमानिकाला एका गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. अद्याप अधिकृतरीत्या त्याची ओळख उघड करण्यात आलेली नाही, मात्र तो पाकिस्तानच्या वायुदलातील वरिष्ठ अधिकारी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताची आक्रमक भूमिका
Related News
“भारताच्या सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत”
“भारताविरुद्ध कट रचणाऱ्या अल्पवयीनाची गुजरातमधून अटक;
“मला 2 कोटी मागितले अन् वैष्णवीचा जीव गेला!”
भारतात पुन्हा कोरोनाचा फैलाव,
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ!
पाकिस्तानसाठी काम करत होते, ज्योती मल्होत्राची मोठी कबुली;
कोकणात मुसळधार पावसाचा कहर!
केदारनाथ ते देहरादूनपर्यंत पावसाचा इशारा!
मान्सूनची चाहूल! राज्यात प्री-मान्सूनची जोरदार हजेरी,
PM Kisan 20वा हप्ता मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांनी 30 मे पूर्वी पूर्ण करा ‘हे’ महत्त्वाचे काम
पावसामुळे मुंबई इंडियन्सचे स्वप्न भंगणार?
उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामावर शिवसेनेचे तीव्र आंदोलन;
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या हल्ल्यात भारताचे २६ नागरिक शहीद झाले होते. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवादी तळांवर जोरदार हवाई हल्ले केले.
या हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी पाकिस्तानकडून भारतीय सीमांवर ड्रोन व मिसाईल हल्ले करण्यात आले. मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने हे सर्व हल्ले निष्फळ ठरवले. पाकिस्तानने भारताच्या विविध शहरांवर लढाऊ विमानांद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला, त्यातच एक JF-17 विमान भारतीय हद्दीत घुसले होते. त्याला भारताने वेळीच लक्ष्य करून पाडले आणि त्यातील वैमानिक जिवंत पकडण्यात यश मिळवले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त
भारत-पाकिस्तानमध्ये वाढत चाललेला तणाव पाहता संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिका व रशिया यांनी दोन्ही देशांनी संयम ठेवावा, असे आवाहन केले आहे. मात्र भारताने स्पष्टपणे म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोणताही तडजोड होणार नाही.
भारतीय लष्कर सध्या सर्व सीमेवर सज्ज असून पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रत्येक कारवायेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.