पावसाअभावी देशातील अनेक भागात तापमानात वाढ झाली होती.
त्यामुळे पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाची इच्छा लवकरच पूर्ण
होणार आहे. येत्या 4 दिवसात राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होईल
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 20 सप्टेंबरपर्यंत
पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रासहीत छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा, नागालँड, मणिपूर,
मिझोराम आणि त्रिपुराच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज
भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याशिवाय, काही राज्यात
मुसळधार पावसाचा अंजा वर्तवला आहे. बंगालच्या उपसागराच्या
लगत असलेल्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
त्यात झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि ईशान्येकडील
अनेक भागांचा समावेश आहे. तिथे येत्या 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार
पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या किनारपट्टीवर तयार
झालेला खोलदाब हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे. सोमवारी याचे
रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. त्यामुळे देशातील काही
भागात पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टा
तयार झाल्यास महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय होईल. मात्र, हा पाऊस सौम्य
स्वरूपाचा असेल. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरातही ढगाळ
वातावरण तयार होऊन पावसाच्या सरी कोसळणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/announcement-made-by-maratha-agitating-chief-minister-advat/