यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हवामान
विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला. आता ऑक्टोंबर
महिन्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. ऑक्टोंबर
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
महिन्यात सरासरीपेक्षा ११५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दीर्घकालीन सरासरीनुसार ऑक्टोंबर महिन्यात ७५.४ मिमी पाऊस
पडतो. डिसेंबर महिन्यापर्यंत पावसाचे संकेत भारतीय हवामान
विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्यूजंय महापात्रा यांनी दिले.
हवामान विभागाने मे महिन्यात नैर्ऋत्य मान्सून १०६ टक्के पडणार
असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार यंदा पाऊस
चांगला झाला. आता ऑक्टोंबर ते डिसेंबर दरम्यान ईशान्य
मान्सूनदेखील चांगला होणार आहे. या काळात दक्षिण भारतात
सर्वाधिक पाऊस पडणार आहे. तसेच महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा
जास्त पाऊस पडणार आहे. नवरात्र उत्सावात यंदा पाऊस
असणार आहे. दोन दिवस पावसाची विश्रांती असून ६
ऑक्टोंबरपासून पाऊस सक्रीय होणार आहे. ६ ते ९ ऑक्टोंबर
दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. जेष्ठ
हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, यंदा
राज्यात १२६ टक्के पाऊस झाला आहे. सामान्यपेक्षा जास्त
पावासाचा वर्तवलेला अंदाज खरा ठरला. २०२३ मध्ये राज्यात
पाऊस कमी झाला होता. तो यंदा चांगला झाला. विश्रांतीनंतर
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पुन्हा परतीचा प्रवास सुरु केला आहे.
वायव्य भारताच्या बहुतांश भागातून मान्सून परतला आहे. येत्या
दोन दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांतून मान्सून परतणार आहे,
अशी माहिती हवामान खात्याने दिली. यंदा मान्सूनचा परत
जाण्याचा प्रवास लांबला आहे. संपूर्ण राज्यातून मान्सून परत
जाण्यासाठी १० ऑक्टोंबर उजाडेल, असा अंदाज आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/ahilyanagar-does-not-come-from-ahmednagar/