अकोला | प्रतिनिधी
आज दिनांक ७ जुलै २०२५ रोजी अकोला रेल्वे स्टेशन परिसरात हवामानामुळे अचानक निंबाच्या झाडाची मोठी फांदी
तुटल्याने झाडावर वास्तव्यास असलेले सुमारे ६० बगळे – पिल्ले व प्रौढ – जमिनीवर कोसळले.
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
यामध्ये त्यांची घरटी पूर्णपणे नष्ट झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बगळ्यांवर संकट कोसळले.
पिल्ले आणि मोठे बगळे सैरावैरा पळू लागले, काहीजण घाबरून उडून गेले तर काही अपघाताने जखमी झाले.
घटनास्थळी स्थानिक ऑटो चालक, अरविंद पाटोळे, लालशा, अनिवृध्द गजबिए आणि जब्बार शेख यांनी तत्काळ
परिस्थितीची दखल घेतली आणि सर्पमित्र व मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना याची माहिती दिली.
बाळ काळणेंची तत्पर सेवा – जीवदानाची शर्थ
बाळ काळणे यांनी पावसातच घटनास्थळी धाव घेतली आणि जमिनीवर सैरावैरा फिरणाऱ्या बगळ्यांना स्वतःच्या हाताने एक
एक करून सावधपणे उचलून बॉक्समध्ये ठेवले.
बगळ्यांकडून चोच मारण्याचा धोका असूनही काळणे यांनी धैर्याने आणि तन्मयतेने हे कार्य पार पाडले.
स्थानिक आणि वनविभागाचे मोलाचे सहकार्य
या बचावकार्यात वनरक्षक शेखर गाडबैल, चालक यशपाल इंगोले, अक्षय खंडारे, पशुवैद्यकीय
अधिकारी मेघा वानखडे आणि प्रविण पवार यांनी पुढाकार घेतला.
जखमी आणि धोक्यात असलेले सर्व बगळे योग्य पद्धतीने गोळा करून वनविभागात उपचारासाठी नेण्यात आले.
वनविभागाचा विशेष गौरव
या तत्पर आणि संवेदनशील कार्याबद्दल बाळ काळणे यांचे सहाय्यक वनसंरक्षक नम्रता टाले,
आरएफओ विश्वास थोरात आणि वनपाल गजानन गायकवाड यांनी कौतुक केले.
सध्या सर्व बगळ्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना योग्य निगा राखत वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/mahamargawar-dambi-java-car-overturned-a-wound/