विचार करून निर्णय घेणार- राहुल गांधी
लोकसभा निवडणुकीत एनडीए’ला बहुमत मिळाले,
Related News
बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री हेलेन या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत,
पण यावेळी त्यांच्या सिनेमामुळे नव्हे, तर त्यांच्या फिटनेस आणि जिंदादिलीमुळे. ८६ वर्षांच्या वयातही
हेलेन यांनी ...
Continue reading
गुजरात ATS ने नुकताच एक धक्कादायक खुलासा करत देशात सुरू असलेल्या सायबर गुप्तहेरगिरीच्या
मोठ्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत नाडियाड (गुजरात) येथून जसीम शाहनवाज अन्सारी...
Continue reading
अकोला –
शहरातील नवीन एसटी बस स्थानक चौकात आज दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला.
बस टी पॉइंट जवळून अशोक वाटिकेकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी
बसच्या मागील बाजूस एक ...
Continue reading
शिवर गावात आज जागतिक शून्य सावली दिन पारंपरिक वारकरी परंपरेने आणि संत
विचारांच्या प्रचार-प्रसाराने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
श्री संत गजानन महाराज सेवा समिती, शिवर यां...
Continue reading
पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागांत
सूर्य कधीच पूर्णपणे डोक्यावरून जात नाही. मात्र या दोन वृत्तांमधील स्थानिकांना वर्षातून
दोन वेळा सूर्य नेमक...
Continue reading
उत्तर भारतात प्रचंड उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोडी हवामान बदलाची दिलासा मिळणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ मे रोजी (शनिवार) आणि पुढील दोन दिवस दिल्ली-ए...
Continue reading
वाराणसी (उत्तरप्रदेश) – पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर भारतीय सेनेने केलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचा ठसा आता फक्त रणांगणातच नव्हे तर बनारसच्या हातमागावरही उमटला आहे.
ये...
Continue reading
पाटणा (बिहार): पाटणा-जयनगर दरम्यान ‘नमो भारत’ (वंदे मेट्रो) ट्रेन सुरू झाल्यानंतर
आता बिहारमधील दुसऱ्या मार्गावरही ही हायटेक वातानुकूलित ट्रेन धावण्याची शक्यता आहे.
पाटणा ते गयाज...
Continue reading
नॉटिंघम (ENG vs ZIM): तब्बल २२ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर खेळण्यासाठी आलेल्या
झिम्बाब्वे संघाचा इंग्लंडने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला. टेस्ट क्रिकेट खेळतोय की T20,
असा संभ्रम ...
Continue reading
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रावर निसर्गाचा प्रचंड तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून,
हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई...
Continue reading
नवी दिल्ली : भारताने सिंधू पाणी करारातील काही अटी निलंबित केल्यानंतर पाकिस्तानकडून
पुन्हा एकदा उर्मट प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानच्या लष्करातील लेफ्टनंट जनरल
अहमद शरीफ चौध...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी): "बडे बाप का बेटा" असला तरी तुरुंगात सगळ्यांना सारखंच वागवलं जातं,
असं सूचित करत खासदार संजय राऊत यांनी शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानच्या
तुरुंगातील वास्तव...
Continue reading
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
दरम्यान, शनिवारी काँग्रेस कार्यकारिणी आणि पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठक पार पडल्या.
लोकसभा निवडणुक निकालानंतर काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत
राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची मागणी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही राहुल गांधींच्या नावासाठी आग्रह धरला आहे.
त्यामुळे, संसदेतील विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधींची निवड होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बैठकीमध्ये अनेक सदस्यांनी राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष नेतेपद घ्यावं,
यासाठी विनंती केली आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील राहुल गांधी यांना
पक्ष सदस्यांच्या भावना मान्य करावे लागतील,
असे म्हटले आहे.
तर, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत
संसदेतील विरोधीपक्षनेतेपदासाठी राहुल गांधींच्याच नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाल्याचं
काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल राव यांनीही सांगितलं आहे.
तर, काँग्रेस पक्षाचे गटनेते म्हणून राहुल गांधींनी निवड झाल्याचंही जाहीर करण्यात आली आहे.
त्यामुळे, राहुल गांधींच विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीवर बसू शकतात हे जवळपास निश्चित झालं आहे.
मणिकम टागोर यांनी राहुल गांधी यांना संसदेच्या कनिष्ठ सभागृहात काँग्रेसचे नेते बनण्याचे आवाहन केलेय.
मणिकम टागोर हे तामिळनाडूतील विरुधुनगरमधून विजयी झाले आहेत.
ते म्हणतात की, ‘मी माझे नेते राहुल गांधी यांच्या नावाने मते मागितली.
ते लोकसभेतील काँग्रेसचे नेते असावेत, असे मला वाटते.
मला आशा आहे की काँग्रेसचे निवडून आलेले खासदारही असाच विचार करतील.
बैठकीत के.सी. वेणुगोपाल म्हणाले की, आता काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन सुरू झाले आहे.
हा CWC चा आत्मा आहे.
काँग्रेस कार्यकारिणीने एकमताने राहुल गांधींना
लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची विनंती केली आहे.
संसदेत या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी हे सर्वात योग्य व्यक्ती आहेत.