पंतप्रधान बनू शकत नसल्याने देशाचं वाटोळं करायला निघालेत,
कंगना रनौतचा हल्लाबोल
बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रनौत
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
लोकसभा निवडणूक लढवून खासदार झाली आहे.
हिमाचल प्रदेशमधल्या मंडी येथून कंगनानं निवडणूक लढवली आणि जिंकलीही.
अशातच भाजप खासदार असलेली कंगना रनौत अनेकदा काँग्रेस नेत्यांवर
प्रहार करताना दिसून येते. कंगना रनौतनं सोशल मीडियाच्या माध्यमातून
पुन्हा एकदा काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर
निशाणा साधला आहे. किंबहुना, राहुल गांधींनी हिंडनबर्ग अहवालावर
सरकारला कोंडीत पकडलं आहे. ज्यात त्यांनी अदानी समूह आणि सेबी यांच्यातील
संगनमताचा आरोपही केला आहे. यावरुन कंगनानं राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.
कंगना रनौतनं यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये कंगनानं लिहिलंय की,
“राहुल गांधी सर्वात धोकादायक माणूस आहे, ते विषारी आणि विध्वंसक आहेत.
जर ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत, तर ते या देशाला उद्ध्वस्त करू शकतात,
हा त्यांचा अजेंडा आहे. हिंडनबर्गच्या अहवालानं आमच्या शेअर बाजाराला लक्ष्य केलं,
ज्याला राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला आणि पण त्या अहवालात काहीच तथ्य नव्हतं.
त्याचा काहीच परिणाम झाला नाही.”खासदार कंगना रनौतनं लिहिलंय की,
ते देशाची सुरक्षा आणि अर्थव्यवस्था अस्थिर करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.
गांधीजी, तुम्ही आयुष्यभर विरोधी बाकांवर बसण्याची तयारी ठेवा आणि आता
जशा तुम्हाला वेदना होत आहेत, तसंच या देशातील जनतेचा राष्ट्रवाद,
अभिमान आणि गौरव पाहून तुम्हाला वाईट वाटेल. इथली जनता तुम्हाला कधीही नेता बनवणार नाही.
Read also: https://ajinkyabharat.com/akolyat-maji-sainikwar-jeevghena-halla/