पंतप्रधान बनू शकत नसल्याने देशाचं वाटोळं करायला निघालेत,
कंगना रनौतचा हल्लाबोल
बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रनौत
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
लोकसभा निवडणूक लढवून खासदार झाली आहे.
हिमाचल प्रदेशमधल्या मंडी येथून कंगनानं निवडणूक लढवली आणि जिंकलीही.
अशातच भाजप खासदार असलेली कंगना रनौत अनेकदा काँग्रेस नेत्यांवर
प्रहार करताना दिसून येते. कंगना रनौतनं सोशल मीडियाच्या माध्यमातून
पुन्हा एकदा काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर
निशाणा साधला आहे. किंबहुना, राहुल गांधींनी हिंडनबर्ग अहवालावर
सरकारला कोंडीत पकडलं आहे. ज्यात त्यांनी अदानी समूह आणि सेबी यांच्यातील
संगनमताचा आरोपही केला आहे. यावरुन कंगनानं राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.
कंगना रनौतनं यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये कंगनानं लिहिलंय की,
“राहुल गांधी सर्वात धोकादायक माणूस आहे, ते विषारी आणि विध्वंसक आहेत.
जर ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत, तर ते या देशाला उद्ध्वस्त करू शकतात,
हा त्यांचा अजेंडा आहे. हिंडनबर्गच्या अहवालानं आमच्या शेअर बाजाराला लक्ष्य केलं,
ज्याला राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला आणि पण त्या अहवालात काहीच तथ्य नव्हतं.
त्याचा काहीच परिणाम झाला नाही.”खासदार कंगना रनौतनं लिहिलंय की,
ते देशाची सुरक्षा आणि अर्थव्यवस्था अस्थिर करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.
गांधीजी, तुम्ही आयुष्यभर विरोधी बाकांवर बसण्याची तयारी ठेवा आणि आता
जशा तुम्हाला वेदना होत आहेत, तसंच या देशातील जनतेचा राष्ट्रवाद,
अभिमान आणि गौरव पाहून तुम्हाला वाईट वाटेल. इथली जनता तुम्हाला कधीही नेता बनवणार नाही.
Read also: https://ajinkyabharat.com/akolyat-maji-sainikwar-jeevghena-halla/