पंतप्रधान बनू शकत नसल्याने देशाचं वाटोळं करायला निघालेत,
कंगना रनौतचा हल्लाबोल
बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रनौत
Related News
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
१७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
अकोट : मच्छीसाथ परिसरात बस व मोटारसायकलचा भीषण अपघात —
१०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी — एएनएम कोर्ससाठी १० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
दुनियातील सर्वात उंच चिनाब ब्रिज वर तिरंगा फडकावत PM मोदी; चीन-पाकिस्तानला ठाम संदेश
आमदार अमोल मिटकरी त्यांच्या निवासस्थानी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
अकोल्याच्या आळंदा ग्रामपंचायतीचा पुढाकार जिल्हा परिषद च्या शाळेत प्रवेश घेणाऱ्यासाठी करमाफीची घोषणा.
कापशी रोडवरील वादळी वाऱ्यामुळे बाबळीच मोठं झाड कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही.
ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोटमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई;
अकोट येथील मंडळ अधिकाऱ्यावर प्राण घातक हल्ला
बुलडाणा अर्बन अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन.
लोकसभा निवडणूक लढवून खासदार झाली आहे.
हिमाचल प्रदेशमधल्या मंडी येथून कंगनानं निवडणूक लढवली आणि जिंकलीही.
अशातच भाजप खासदार असलेली कंगना रनौत अनेकदा काँग्रेस नेत्यांवर
प्रहार करताना दिसून येते. कंगना रनौतनं सोशल मीडियाच्या माध्यमातून
पुन्हा एकदा काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर
निशाणा साधला आहे. किंबहुना, राहुल गांधींनी हिंडनबर्ग अहवालावर
सरकारला कोंडीत पकडलं आहे. ज्यात त्यांनी अदानी समूह आणि सेबी यांच्यातील
संगनमताचा आरोपही केला आहे. यावरुन कंगनानं राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.
कंगना रनौतनं यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये कंगनानं लिहिलंय की,
“राहुल गांधी सर्वात धोकादायक माणूस आहे, ते विषारी आणि विध्वंसक आहेत.
जर ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत, तर ते या देशाला उद्ध्वस्त करू शकतात,
हा त्यांचा अजेंडा आहे. हिंडनबर्गच्या अहवालानं आमच्या शेअर बाजाराला लक्ष्य केलं,
ज्याला राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला आणि पण त्या अहवालात काहीच तथ्य नव्हतं.
त्याचा काहीच परिणाम झाला नाही.”खासदार कंगना रनौतनं लिहिलंय की,
ते देशाची सुरक्षा आणि अर्थव्यवस्था अस्थिर करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.
गांधीजी, तुम्ही आयुष्यभर विरोधी बाकांवर बसण्याची तयारी ठेवा आणि आता
जशा तुम्हाला वेदना होत आहेत, तसंच या देशातील जनतेचा राष्ट्रवाद,
अभिमान आणि गौरव पाहून तुम्हाला वाईट वाटेल. इथली जनता तुम्हाला कधीही नेता बनवणार नाही.
Read also: https://ajinkyabharat.com/akolyat-maji-sainikwar-jeevghena-halla/