जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस
नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा निवडणुकीच्या
तयारीला लागले आहेत. राहुल गांधींनी आता दिल्ली विधानसभा
Related News
मोफत महाआरोग्य शिबिर..
RCB च्या विजयाचा आनंद साजरा करताना चाहत्यांचा मृत्यू
बेंगलोर मध्ये आरसीबी (RCB) ची विक्ट्री परेड मध्ये सात लोकांचा मृत्यू…
तेल्हारा शहरातील घरकुल लाभार्थ्यांना उर्वरित टप्प्यांचे पैसे लवकर देण्याची मागणी भाजप शिष्टमंडळाची
रोहित पवारांना अमोल मिटकरी यांचा टोला – “हेलिकॉप्टरमधून उतरा, ग्राउंड लेव्हलवर या!
गोरखपूरमध्ये पतीने पत्नीचा गळा चिरून केला खून…
लखनऊ – कानपूर रॅपिड रेल प्रकल्पाला हिरवा कंदील, एलडीएकडून NOC मंजूर
पिंजर येथे जिओ कंपनीचे मोबाईल नेटवर्क सलाईनवर….
मानसून कधी देणार उत्तराखंडमध्ये दस्तक?
संगीता जाधव यांची राज्य सरचिटणीस पदी निवड;
शिवाजी नगर शेत शिवारात जंगली जनावराचा हल्ला
राज्यभरात कोरोनाचे रुग्ण…
निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी
काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात १४ जानेवारी ते ३० मार्च
दरम्यान मणिपूर ते महाराष्ट्र अशी भारत न्याय यात्रा काढली होती.
आता काँग्रेस २३ ऑक्टोबरपासून दिल्लीत न्याय यात्रा
काढण्याच्या तयारीत आहे. या न्याय यात्रेदरम्यान दिल्लीतील
भाजपच्या तीन वेळा विजयी खासदारांच्या अपयशाचा मुद्दा
ठळकपणे मांडणार आहे. काँग्रेसची न्याय यात्रा २३
ऑक्टोबरपासून दिल्लीतून सुरू होणार आहे. या यात्रेत राहुल गांधी
आणि प्रियांका गांधी सहभागी होणार आहेत. सणांच्या
पार्श्वभूमीवर ही यात्रा २३ ऑक्टोबरपासून २८ नोव्हेंबरला संपेल.
काँग्रेस न्याय यात्रेच्या पहिल्या ही यात्रा २३ ते २८ ऑक्टोबर
दरम्यान निघणार आहे ते १० नोव्हेंबर, १२ ते आणि शेवटच्या
नोव्हेंबर या टप्प्यात २० ते २८ कालावधीत निघणार आहे.
यासोबतच दिल्लीचे नायब आप सरकार देखील न्याय मोदी
सरकार, राज्यपाल आणि यांच्यातील वादावर यात्रेतून प्रकाश
टाकला जाणार आहे. केजरीवाल सुरू होऊन टप्प्यांतर्गत. त्यानंतर
४ १८ नोव्हेंबर या सरकार आणि आपचे मद्य धोरण
प्रकरणाला लक्ष्य करण्याबरोबरच त्यांच्या धोरणांवरही
काँग्रेसकडून निशाणा साधला जाणार आहे. पंजाब आणि
हरियाणाच्या धर्तीवर दिल्लीतही काँग्रेस आणि आपमध्ये युती
होणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे न्याय यात्रेतून
काँग्रेसला निवडणुकीत मोठा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.
यात्रेदरम्यान, काँग्रेसकडून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला
दीक्षित यांच्या कार्यकाळाची आठवण करून दिली जाणार आहे.