अहिल्यानगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय
स्मारक उभारण्यासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे
पाटील यांनी केलेल्या निर्णयाचे ज्येष्ठ नेते शाळीग्राम होडगर यांनी
Related News
एक पपईचा पक्का तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करा.
ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुमारे १ तास ठेवून थंड पाण्याने धुवा.
हे नियमित केल्यास चेहऱ्याचा रंग नक्कीच उजळतो.
🥥 २. ना...
Continue reading
कांगो | १७ एप्रिल २०२५
अफ्रिकेतील कांगो नदीवर एक अत्यंत वेदनादायक बोट दुर्घटना घडली असून,
आतापर्यंत किमान १४८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी अजूनही बेपत्ता असल्याची माह...
Continue reading
फ्लोरिडा | १७ एप्रिल २०२५
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील ऑरलॅंडो विमानतळावर (MCO) एक भयंकर अपघात टळला असून,
फ्रंटियर एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये उड्डाणाच्या वेळी अचानक इंजिनाला आग ल...
Continue reading
प्रतिनिधी, रांची | १७ एप्रिल २०२५
झारखंडच्या राजधानी रांचीमध्ये पहिल्यांदाच भारतीय वायुदलाचा दोन दिवसीय
भव्य एअर शो आयोजित करण्यात येत आहे. १९ आणि २० एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते १०...
Continue reading
तिनिधी, दिल्ली | १७ एप्रिल २०२५
दिल्लीतील उत्तर-पूर्वेकडील मुस्तफाबाद भागात आज पहाटे एक भीषण दुर्घटना घडली.
शक्ती विहार परिसरातील चार मजली इमारत भरधाव वेगाने कोसळल्याने आतापर्यंत...
Continue reading
प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घडामोड समोर आली आहे.
म.न.से अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
प्रमुख उद्धव ठाकरे यांना थे...
Continue reading
प्रतिनिधी, अकोलासध्या विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.
अकोला जिल्ह्यात तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून,
याचा परिणाम फक्त माणसांवरच नव...
Continue reading
ऑनलाईन प्रतिनिधी |
जंगलात घडणाऱ्या जनावरांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील,
पण एका माकडाच्या टोळक्यांनी ‘गँगवॉर’सारखी भीषण झटापट केल्याचा
थरारक व्हि...
Continue reading
मैनपुरी | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला आहे.
एका पतीने आपल्या पत्नीच्या मारहाणीचा व्हिडीओ तयार करून पोलिसांकडे तक्रार केली,
म...
Continue reading
हरदोई | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून एक अजब व धक्कादायक घटना समोर आली आहे.
येथे एका पतीने आपल्या पत्नीची फक्त आइब्रो सेट केली म्हणून तिला चांगलाच चाप दिला –
थेट ...
Continue reading
हरिद्वार | प्रतिनिधी
उत्तराखंडमधील हरिद्वार-देहरादून महामार्गावर एका महिलेने अचानक महामार्गाच्या मध्यभागी
येऊन गाड्यांसमोर उभी राहत जोरदार गोंधळ घातल्याची घटना घडली आहे.
या घटने...
Continue reading
- ईस्टर संडेनिमित्त विविध कार्यक्रम
अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहर...
Continue reading
स्वागत केले असून, या स्मारकामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा
इतिहास जगासमोर येईल आणि महिलांच्या सक्षमीकरणाच्या
संदेशाचे कृतीत रुपातंर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात बोलताना होडगर म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे
जन्मगाव हे आपल्या जिल्ह्यातील असले तरी, त्यांचे संपूर्ण जीवन
हे देशासाठी समर्पित झाले. हा इतिहास नव्या पिढीसमोर आणणे
खूपच गरजेचे होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी हिंदू धर्मावर
असलेली श्रध्दा आपल्या उक्ती आणि कृतीतून दाखवून दिली.
त्याचबरोबर इतर सर्व धर्मांच्या सन्मानाप्रित्यर्थ मोठे योगदान देऊन
मानवता धर्माचे आचरण केले. उत्तम आणि आदर्श प्रशासक म्हणून
त्यांची एक ख्याती होती. त्यांचे कार्य समाजातील प्रत्येक घटकाला
न्याय मिळवून देणारेच होते. एवढेच नाही तर रोजगाराच्या निर्माण
कार्यातही त्यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. देशातील मंदिरांचे
विकास असेल किंवा नदीकाठच्या घाटांचा पुनर्विकासाला प्राधान्य
देऊन अहिल्यादेवी होळकरांनी या देशाची संस्कृती, परंपरा आणि
मूल्य जोपासण्याच्या केलेल्या ऐतिहासिक कार्याचा वारसा हा
आपल्या सर्वांनाच अभिमानास्पद असा आहे. नव्या पिढीला या
इतिहासाची जाणीव करून देण्याच्यादृष्टीने जिल्ह्याच्या भूमिमध्ये
त्यांचे स्मारक उभे राहणे हे आपल्या सर्वांनाच प्रेरणादायी
असल्याचे होङगर म्हणाले. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे
पाटील यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतल्याबद्दल समाधान व्यक्त
करून होडगर यांनी सांगितले, की या स्मारकाची संकल्पना
यापूर्वीच कार्यान्वित होण्याची गरज होती. परंतु आता मंत्री विखे
पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्मारकाचा तयार होत असलेला
आराखडा खूपच अभ्यासपूर्ण असा आहे. या स्मारकामध्ये
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनकार्याची संपूर्ण वाटचाल,
महिलांच्या सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन केंद्र, अध्यासन केंद्र या
बरोबरीनेच एक चांगले असे पर्यटनस्थळ जिल्ह्याच्या भूमीमध्ये उभे
राहत असल्याचा निश्चितच आनंद आहे. अहिल्यादेवींचे जन्मस्थळ हे
जिल्ह्यातीलच असल्यामुळे या उभ्या राहणाऱ्या स्मारकामुळे
जिल्ह्याची नवी ओळखही निर्माण होईल.
Read also: https://ajinkyabharat.com/highest-turnout-in-jammu-and-kashmir-elections-in-udhampur/