अहिल्यानगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय
स्मारक उभारण्यासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे
पाटील यांनी केलेल्या निर्णयाचे ज्येष्ठ नेते शाळीग्राम होडगर यांनी
Related News
अकोला शहरातील काँग्रेसचे माजी महापौर तथा ज्येष्ठ नेते मदन भरगड यांनी आज राष्ट्रवादी
काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने
...
Continue reading
नवी दिल्ली |
भारतीय जनता पक्षाचा (भाजप) नवा राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे.
संघटनात्मक अनुभव, प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि जातीय समतोल या निकषांवर अंतिम निवड होण...
Continue reading
नवी दिल्ली |
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता.
यावर निवडणूक आयोगाने शनिवारी हा दावा फेटाळून लावला आहे. आयोगा...
Continue reading
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोंधळवाडी परिसरामध्ये असलेल्या स्टोन क्रेशर परिसरामध्ये
उभ्या असलेल्या ट्रक आणि ट्रॉली यांना अचानक आग लागल्यामुळे सदर प्रकरणी पातुर पोलिस...
Continue reading
७ जून २०२५
पातूर : अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली
असून दुचाकीवरील दोन व्यक्ती जखमी झाले असल्याचे निदर्शनास आले,मात्र अवैधरित्या डिझेल वा...
Continue reading
अकोट
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्या अंतर्गत अकोट नगर परिषदने उत्कृष्ट
कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम व अमरावती विभागात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या उ...
Continue reading
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि उबाठा
गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा जोमात सुरु असताना मुंबईत मनसेला जोरदार हाद...
Continue reading
दिल्ली |
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कडक उन्हाचा आणि उकाड्याचा हंगाम परतला आहे.
गेल्या काही दिवसांतील वादळ आणि पावसाचा कालावधी संपल्यानंतर आता
राजधानीत तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्...
Continue reading
दानापूर : ( वा )
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दानापूर परिसरातील शेतकऱ्यांना
मोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे थांबलेल्या मशागती...
Continue reading
दानापूर : (वा)
अकोला येथे लग्न समारंभआटोपून परत येत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना
दि. ५ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता दानापूर येथे घड...
Continue reading
अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताचे सत्र सुरूच आहे.
दरम्यान आज सकाळीही अकोल्याच्या अकोट अजनगांव मार्गावर खाई नदीवरील पुलाजवळ एका
मोटरसायकल स्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात भीष...
Continue reading
राज्य सरकारने महाराष्ट्रात ‘राज्य अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन केल्याबद्दल महायुती
सरकारचे उमेश पवार यांनी अभिनंदन केले आहे.
राज्य निर्मितीनंतर प्रथमच आदिवासी समाजासाठी स्वतंत...
Continue reading
स्वागत केले असून, या स्मारकामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा
इतिहास जगासमोर येईल आणि महिलांच्या सक्षमीकरणाच्या
संदेशाचे कृतीत रुपातंर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात बोलताना होडगर म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे
जन्मगाव हे आपल्या जिल्ह्यातील असले तरी, त्यांचे संपूर्ण जीवन
हे देशासाठी समर्पित झाले. हा इतिहास नव्या पिढीसमोर आणणे
खूपच गरजेचे होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी हिंदू धर्मावर
असलेली श्रध्दा आपल्या उक्ती आणि कृतीतून दाखवून दिली.
त्याचबरोबर इतर सर्व धर्मांच्या सन्मानाप्रित्यर्थ मोठे योगदान देऊन
मानवता धर्माचे आचरण केले. उत्तम आणि आदर्श प्रशासक म्हणून
त्यांची एक ख्याती होती. त्यांचे कार्य समाजातील प्रत्येक घटकाला
न्याय मिळवून देणारेच होते. एवढेच नाही तर रोजगाराच्या निर्माण
कार्यातही त्यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. देशातील मंदिरांचे
विकास असेल किंवा नदीकाठच्या घाटांचा पुनर्विकासाला प्राधान्य
देऊन अहिल्यादेवी होळकरांनी या देशाची संस्कृती, परंपरा आणि
मूल्य जोपासण्याच्या केलेल्या ऐतिहासिक कार्याचा वारसा हा
आपल्या सर्वांनाच अभिमानास्पद असा आहे. नव्या पिढीला या
इतिहासाची जाणीव करून देण्याच्यादृष्टीने जिल्ह्याच्या भूमिमध्ये
त्यांचे स्मारक उभे राहणे हे आपल्या सर्वांनाच प्रेरणादायी
असल्याचे होङगर म्हणाले. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे
पाटील यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतल्याबद्दल समाधान व्यक्त
करून होडगर यांनी सांगितले, की या स्मारकाची संकल्पना
यापूर्वीच कार्यान्वित होण्याची गरज होती. परंतु आता मंत्री विखे
पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्मारकाचा तयार होत असलेला
आराखडा खूपच अभ्यासपूर्ण असा आहे. या स्मारकामध्ये
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनकार्याची संपूर्ण वाटचाल,
महिलांच्या सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन केंद्र, अध्यासन केंद्र या
बरोबरीनेच एक चांगले असे पर्यटनस्थळ जिल्ह्याच्या भूमीमध्ये उभे
राहत असल्याचा निश्चितच आनंद आहे. अहिल्यादेवींचे जन्मस्थळ हे
जिल्ह्यातीलच असल्यामुळे या उभ्या राहणाऱ्या स्मारकामुळे
जिल्ह्याची नवी ओळखही निर्माण होईल.
Read also: https://ajinkyabharat.com/highest-turnout-in-jammu-and-kashmir-elections-in-udhampur/