कोकण, मध्य महाराष्ट्र मध्येही पाऊस बरसणार
हवामान विभागाचा अंदाज
यंदाचा मान्सून परतीच्या वाटेवर असताना देखील राज्यात
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
अनेक ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस जोरदार बरसत असल्याचं
चित्र मागील काही दिवसांपासून बघायला मिळत आहे. आज
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुणे, कोकण आणि
मध्य महाराष्ट्रात पाऊस जोरदार बरसण्याचा अंदाज आहे.
पावसासोबत वीजांचा कडकडाट देखील होण्याचा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन
हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. हवामान विभागाच्या
अंदाजानुसार आज 16 ऑक्टोबर दिवशी पुणे, ठाणे, रायगड,
सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर या भागामध्ये
वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार आहे. वीजा चमकत
असताना सुरक्षित ठिकाणी रहावं असं आवाहन करण्यात आले
आहे. मराठवाड्यामध्ये आज हलक्या सरींचा अंदाज आहे. त्यामुळे
जोरदार सरी नसल्या तरीही शेतकर्यांनी पिकांचं रक्षण करण्याचा
सल्ला देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार,
पावसाच्या सरी या पुढील 5 दिवस कायम बरसत राहणार आहेत.
त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. सध्या राज्यात
काही ठिकाणी दिवसा उन्हाचा प्रखर तडाखा आणि संध्याकाळी
पावसाच्या दमदार सरी हजेरी लावत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/andheritil-riya-palace-building-massive-fire-tighancha-death/