राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून
मध्यरात्रीपासूनच ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही पावसाने जोरदार
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे, सोलापूर,
सांगली, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, हिंगोली, परभणीसह अनेक
जिल्ह्यात वरुणराजाचं आगमन झालं आहे. मात्र, या परतीच्या
पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असून अनेक ठिकाणी
फळबागा धोक्यात आल्या आहेत. तर, काही ठिकाणी खरीपची
पिकेही पाण्यात गेल्याचं चित्र आहे. पुणे शहरात अचानक दुपारी
आलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच दमछाक
झाली. पुणे शहरासह ग्रामीण भाग, त्याचबरोबर धरण क्षेत्रात
देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यानंतर, पुण्यातील
टिळक रस्त्यावर पाणी साचलं होतं, अनेक रस्त्यांवर पाणी
साचलेलं असून रस्त्यांवर स्लो ट्रॅफिक पाहायला मिळतंय.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस असाच
पाऊस पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात असणार आहे.
तसेच, राज्यातील विविध भागात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा
अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/president-of-ashutosh-gowarikar-international-film-festival/