कर्तव्य बजावण्याचे सरकारचे आवाहन
महाराष्ट्र शासनाने २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानानिमित्त
राज्यात सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
विधानसभा निवडणुकीसाठी २० तारखेला मतदान होणार आहे.
तर २३ तारखेला मतमोजणी करून निकाल जाहीर होणार आहे.
दरम्यान नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार राज्यात मतदानाच्या
दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्यातील नागरिकांना मतदान करता
यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढून २० नोव्हेंबर
२०२४ साठी सुट्टी जाहीर केली आहे. सर्व विधानसभा मतदारसंघात
ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र शासनाची
कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक
उपक्रम आणि बँक या ठिकाणी ही सार्वजनिक सुट्टी लागू असणार
आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.
राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना महाराष्ट्र
शासनाने मोठा निर्णय जाहीर केला आहे. शासनाने २० तारखेला
मतदानाची सुट्टी जाहीर केली आहे. राज्यातील सर्व मतदारांना
मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य सरकारने हा निर्णय
घेतला आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन
शासनाने केले आहे. राज्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने
विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. तसेच ज्यांना पूर्ण
दिवस सुट्टी देणे शक्य नसेल त्यांनी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर
करावी असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे. दरम्यान
भाजपने आपल्या पहिल्या यादीतून ९९ उमेदवारांची घोषणा केली
आहे. शिवसेनेने ४५ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ३८ उमेदवार
जाहीर केले आहेत. तसेच दुसरीकडे महाविकास आघाडीकडून
ठाकरे गटाने ६५ उमेदवार जाहीर केले आहेत. वंचित बहुजन
आघाडी आणि परिवर्तन महाशक्ती आघाडीने देखील आपले
उमेदवार जाहीर केले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/november-6-hearing-regarding-nationalist-party-symbol/