मराठी रंगभूमीचा अभिजात इतिहास घडवणारी अनेक नाटकं आजवर झालीत.
ही यादी इतकी मोठी आहे की, प्रत्येकाचं नाव यामध्ये घेणं जवळपास अशक्यच.
यामधील अनेक नाटकांचे विक्रमी प्रयोग झालेही.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
आजच्या घडीलाही नवी पिढी वेगवेगळ्या विषयांवरची नाटकं रंगभूमीवर
घेऊन येतायत. पण असं असलं तरीही एखाद्या नाटकाचे विक्रमी प्रयोग होणं
ही गोष्ट फार दुर्मिळ झाली आहे. असं असलं तरीही एका नाटकाची जादू
ही रंगभूमीवर आजतागायत जिवंत आहे, ही विशेष बाब आणि ते नाटक म्हणजे
भरत जाधव यांचं ‘सही रे सही’ नाटक.
येत्या 15 ऑगस्ट रोजी या नाटकाचा बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात
4444 वा प्रयोग होणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी भरत जाधव यांच्या
मोरुची मावशी आणि अस्तित्व या नाटकाचे देखील प्रयोग याच दिवशी
या नाट्यगृहात होणार आहेत. भरत जाधव एन्टरटेन्मेंटतर्फे ‘सही रे सही’च्या या
विक्रमी प्रयोगाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थिती लावणार आहेत.
राज ठाकरेंच्या उपस्थितीवर भरत जाधव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की,
‘ऑल दि बेस्ट’ नाटकापासून राज ठाकरे खूप जवळ आलेली व्यक्ती आहे.
माझ्या आयुष्यात त्यांनी खूप हातभार लावला आहे.
अर्थात बाळासाहेबांच्यासोबत असल्यापासून त्यांचा आशीर्वाद आहे.
‘सही रे सही’बाबत बोलायचं झालं तर या एका व्यक्तीने ते नाटक समोरुन पाच वेळा पाहिलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/microplastics-found-in-all-brands-of-sweet-and-sugar-sold-in-india/