‘लखपती दीदीं’ना करणार प्रमाणपत्रांचे वाटप
केंद्राच्या ‘लखपती दीदी’ योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना
प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी आणि कार्यक्रमादरम्यान
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
महिला मेळाव्याला संबोधित करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी
25 ऑगस्ट रोजी जळगाव दौऱ्यावर येणार आहेत.
यावेळी काही लाभार्थींना शहराच्या सीमेवर असलेल्या जळगाव विमानतळाजवळील
कार्यक्रमाच्या मैदानावर आमंत्रित केले जाणार आहे.
या ठिकाणी त्यांना कार्यक्रमादरम्यान प्रमाणपत्रे दिली जातील,
तर इतरांना त्यांच्या गावात प्रमाणपत्रे दिली जातील. या कार्यक्रमाला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डीसीएम देवेंद्र फडणवीस व अजित पवार
हे देखील उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम केंद्रीय ग्रामीण
विकास मंत्रालयाने आयोजित केला आहे.
यावेळी 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र दिली जाणार आहेत.
या कार्यक्रमात पंतप्रधान 2500 कोटी रुपयांचा एक फिरता निधी- कम्युनिटी
इन्व्हेस्टमेंट फंड जारी करतील, ज्याचा 4.3 लाख बचत गटांच्या (SHGs) सुमारे
48 लाख सदस्यांना फायदा होईल. यावेळी पंतप्रधान 5000 कोटी रुपयांचे
बँक कर्ज देखील जारी करतील, ज्यामुळे 2,35,400 बचत गटांच्या (SHGs)
25.8 लाख सदस्यांना फायदा होईल.
लखपती दीदी या अशा महिला आहेत ज्या वार्षिक 1 लाख किंवा त्याहून अधिक कमावतात.
या लखपती दीदींनी केवळ आपल्या कुटुंबांना गरिबीतून बाहेर काढले नाही,
तर त्या समाजातील इतरांसाठी आदर्श बनत आहेत.
ग्रामीण विकास मंत्रालयाने यापूर्वीच 1 कोटी लखपती दिदी तयार केल्या आहेत.
आता सरकारचे लक्ष्य पुढील 3 वर्षांत 3 कोटी लखपती दीदी तयार करण्याचे आहे.
दरम्यान, पीएम मोदींच्या या जळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री
गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन, या मार्गावरील वाहतूक वळविण्याचे
नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जळगाव विमानतळापासून 50 किलोमीटर क्षेत्र,
22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट नो ‘नो फ्लाईंग झोन’ असणार आहे.
यासह 24 ऑगस्ट रात्री 8 पासून 25 ऑगस्ट संध्याकाळी 6 पर्यंत
व्यावसायिक उड्डाणे राहणार आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/manoj-jarangenshi-discussion-with-prithviraj-chavan/