पातूर | प्रतिनिधी
अकोल्याच्या पातूर येथील T.K.V. चौक ते आगिखेड दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था आता गंभीर अपघातांना कारणीभूत ठरत आहे.
या खराब रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी झाल्याने एका शेतकऱ्याच्या ज्वारीचे मोठे नुकसान झाले, तर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Related News
पोस्टे खदान पोलिसांची मोठी कामगिरी – ११ घरफोड्यांचे गुन्हे उघड, १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोलवड गावात दुर्दैवी घटना :
बीडमध्ये धक्कादायक घटना: दफनविधीवेळी मृत घोषित केलेलं नवजात बाळ निघालं जिवंत!
कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान
गांधीग्राम येथे कावड यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पूर्णा नदी घाटाची पाहणी
राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी विकास पवार यांची नियुक्ती
गुरुपौर्णिमा: ज्ञान, कृतज्ञता आणि सद्गुणांचा पवित्र उत्सव
इंझोरीत शेतकऱ्यांना दुबार संकट; २०० एकरावर पेरणी खोळंबली,
तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागातील रस्ताचे कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडु
हिंगणा निंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला आले तलावाचे स्वरूप
अकोल्याच्या हिरपूर गावात अंत्यसंस्कारांनाही मिळत नाही सन्मान; पावसाळ्यात मृतदेह नाल्यातून वाहून नेतात गावकरी
या रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की, पावसात त्या मार्गावरून पादचारी चालणेही धोकादायक ठरत आहे.
स्थानिक शाळा सुरू झाल्यामुळे लहान मुलं आणि त्यांचे पालक यांची रोज या रस्त्याने ये-जा सुरु असते.
याच रस्त्यावर चिखलामुळे अनेक वेळा गाड्या घसरून अपघात झाले आहेत, असं नागरिक सांगतायत.
नुकत्याच घडलेल्या ट्रॅक्टर अपघातात शेतकऱ्याच्या ज्वारी पिकाचं नुकसान झालं असून,
यामुळे शेतकरीही हवालदिल झाला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांकडे
रस्ता दुरुस्तीची मागणी करत तात्काळ उपाययोजना न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
यापूर्वीही नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती,
मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीच ठोस पावले उचललेली नाहीत.
“आता पुरे झाली शांतता! रस्ता दुरुस्त न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.