शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक वर्षातच दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत असून,
Related News
Splitsvilla 16 : आज होणार एलिमिनेशन? एपिसोड 24 OTT वर 1 मार्चला सायंकाळी 7 वाजता
लोकप्रिय डेटिंग रिअॅलिटी शो MTV Splitsvilla चा 16वा ...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : रोशन भजनकरच्या घराबाहेरच्या भावनिक पोस्टने चाहत्यांच्या मनात केली घरातली आठवण जिवंत
Bigg Boss Marathi Season 6
Continue reading
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम – चेहरा राहील ताजेतवाने आणि चमकदार
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम : आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्...
Continue reading
नारळ पाणी की ऊसाचा रस: उन्हाळ्यात शरीरासाठी कोणते पेय अधिक फायदेशीर?
उन्हाळा म्हणजे थोडी जास्त तापमानामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्याची काळजी घेण्याची ...
Continue reading
श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात; पातुर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा जागीच मृत्यू
विठ्ठल महल्ले, अकोला : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव श...
Continue reading
महागाई मोजण्याचा नवा फॉर्म्युला: अन्नावर कमी, डिजिटल सेवांवर जास्त खर्च
भारतातील किरकोळ महागाईचे गणित आता पूर्णपणे बदलले आहे. आर्थिक नियामकांनी जानेव...
Continue reading
मुंबई महापालिकेचा ८० हजार कोटींचा अर्थसंकल्प उद्या सादर; या विभागांना भरीव निधी मिळण्याची शक्यता
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी
Continue reading
IPL 2026: शेड्यूलवर मोठा अपडेट, BCCI ने घ्यायचा निर्णय; संपूर्ण क्रिकेटविश्व राहणार हैराण
क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का देणारी बातमी आली आहे. आगामी IPL 202...
Continue reading
ओला इलेक्ट्रिकचा शेअर 157 रुपयांवरून 29 रुपयांवर घसरला; कमकुवत आर्थिक निकालांचे मोठे परिणाम
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सने पुन्हा एकद...
Continue reading
मोठा निर्णय: केरळ राज्याचे नाव आता “केरळम”
केंद्र सरकारने देशातील एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही बातमी ऐकून देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता न...
Continue reading
आजचा सोन्याचा दर: गेल्या 24 तासांत मोठी वाढ, 10 ग्रॅम सोने पोहोचले 1,64,388 रुपये
सोन्याचे दर गेल्या काही काळापासून सतत वाढत आहेत आणि गेल्या 24 तासांत ...
Continue reading
तुमचे शरीर “सामान्य” असले तरीही अस्वस्थ वाटत आहे? डॉक्टरच्या मते शरीराला रीसेंटची गरज दर्शवणारी 10 चिन्हे
कधी तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि सर्व तपासण्या “साम...
Continue reading
अपघाताची शक्यता वाढल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या रस्त्याचे काम सुरुवातीपासूनच अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते.
कामासाठी वापरण्यात आलेले साहित्य हलक्या प्रतीचे असल्यानेच रस्त्याची ही दुर्दशा झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सध्या या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना जुन्या खराब रस्त्याची आठवण होत असून,
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या हेतूवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागात दर्जेदार रस्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या नावाखाली निकृष्ट काम करून शासनाचा निधी वाया घालवला जात
असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यांनी संबंधित विभागाकडे या प्रकरणाची तातडीने
चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या घटनेमुळे लोकांच्या अपेक्षांना आणि विश्वासाला तडा गेल्याचे चित्र आहे.
संबंधीत विभाग आता यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधान परिषेदेचे आमदार वसंत खंडेलवाल यांनी सुद्धा त्यांच्याकडे आलेल्या तक्रारी नुसार या कामाची गुण नियंत्रण विभाग व दक्षता
पथका कडून चौकशी करून संबंध ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव यांना पत्र लिहून केली आहे.
त्यामुळे संबंधित विभागाकडून यावर काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akhher-lekhi-receipt-upcoming-manghar/