सोमवारपासून महाराष्ट्र राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे.
त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या चटक्यांपासून दिलासा मिळाला
आहे. बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पूरक वातावरण निर्माण झाले.
आज पासून पुढील चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह,
मुसळधार आणि मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. आज पहाटे
मुंबई शहरात वीजांच्या कडकडाटीसह पावसाने हजेरी लावली आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज महाराष्ट्र
राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा भागात मुसळधार पाऊस
पडणार आहे. राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम
स्वरुपाचा पाऊस पडणार. बंगालच्या उपसागरातील हवेचे कमी
दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पूर्व किनारपट्टीवर जोरदार पाऊस
पडणार आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात हलक्या ते मध्यम
स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून
येत आहे. राज्याच्या हवामानाची स्थिती पाहता हवामान विभागाने
काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. किनारपट्टीचा भाग
म्हणजे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, बीड, परभणी,
नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर
उर्वरित भागांना आज यलो अलर्ट दिला आहे. आज पहाटे देखील
मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटीसह पाऊस
झाला. सिंधुदुर्ग, अहमदनगर, रायगड, पुणे, सोलापूर, हिंगोली
आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस
आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळाचा अंदाज आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/navra-majha-navsacha-2-chi-box-office-and-strong-earnings/