वाराणसी (उत्तरप्रदेश) – पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर भारतीय सेनेने केलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचा ठसा आता फक्त रणांगणातच नव्हे तर बनारसच्या हातमागावरही उमटला आहे.
येथील बुनकरांनी भारतीय सेनेच्या शौर्याची कहाणी सांगणारी विशेष बनारसी साडी तयार केली आहे.
Related News
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
पंढरीत विठ्ठल भक्तांचा महापूर
राजकीय चर्चा थांबवा! राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
| गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
या साडीवर S-400 मिसाईल, राफेल, ब्रह्मोस, INS विक्रांत यांसारख्या शस्त्रास्त्रांचे प्रतिकात्मक चित्रण करण्यात आले आहे.
साडी कोणासाठी?
बुनकरांची इच्छा आहे की ही साडी विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरैशी
यांना भेट म्हणून दिली जावी – जेणेकरून भारतीय महिलांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून ती साडी सन्मानाने मिरवता येईल.
दोघींनी पाकिस्तानविरोधातील कारवाईत पुढाकार घेतला होता आणि संपूर्ण देशाला अभिमान वाटावा असा संदेश दिला होता.
साडी बनवण्यामागची प्रेरणा
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवत
ऑपरेशन सिंदूर राबवले. याच घटनेनंतर बुनकरांच्या मनात ही साडी तयार करण्याचा विचार आला.
बुनकरांच्या मते, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी महिलांना धमकावले होते की, “जा, मोदींना सांगून ये”.
त्यानंतर व्योमिका सिंह आणि कुरैशी यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत काय घडवून आणलं, हेच या साडीमागे असलेली प्रेरणा आहे.
पंतप्रधान मोदींना भेट देण्याची इच्छा
ही साडी बनवणाऱ्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, “आम्ही ही साडी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट म्हणून द्यायची इच्छा बाळगतो.
मग ती साडी ते ज्यांना योग्य समजतील त्यांना देतील.”
त्यांचं म्हणणं आहे की ही साडी फक्त वस्त्र नाही, तर राष्ट्रप्रेम, सामर्थ्य आणि एकतेचं प्रतीक आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/patna-gaya-aani-buxar-between-lavkarch-dhavel-namo-bharat-express/