नवी दिल्ली | प्रतिनिधी
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर तयार करण्यात आलेल्या सर्वपक्षीय परदेश दौऱ्याच्या प्रतिनिधिमंडळात तृणमूल काँग्रेसने
(TMC) सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला आहे. TMC ने सांगितलं आहे की,
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
त्यांचा कोणताही खासदार किंवा नेता या प्रतिनिधिमंडळाचा भाग असणार नाही.
विशेषतः माजी क्रिकेटपटू आणि खासदार युसुफ पठाण यांचं नाव यामध्ये होते, मात्र आता ते देखील या दौऱ्यावर जाणार नाहीत.
“देशासाठी आम्ही कायम आहोत, पण निर्णय आमचा असावा” — अभिषेक बॅनर्जी
TMC चे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं की,
“देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आम्ही केंद्र सरकारसोबत आहोत. तिथे राजकारण नसावं.
मात्र कोण आमच्या पक्षातून प्रतिनिधी म्हणून जाणार हे आम्ही ठरवू, सरकार नाही.”
“ना सल्ला, ना विचारणा” — TMCचा सरकारवर आरोप
बॅनर्जी यांनी सरकारवर टीका करताना म्हटलं की,
“आम्हाला ना विचारण्यात आलं, ना सल्ला घेण्यात आला. सरकारने स्वतःहून नावं जाहीर केली.
आम्हाला असे लोक पाठवायचे होते जे जागतिक पातळीवर भारताचं योग्य प्रतिनिधित्व करू शकतील.”
‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण दौरा
हे प्रतिनिधिमंडळ अलीकडेच भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय
समर्थन मिळवण्यासाठी परदेश दौऱ्यावर पाठवण्यात येत आहे. केंद्र सरकारने सर्वपक्षीय सहभागाचं आवाहन केलं होतं.
मात्र TMC च्या या निर्णयामुळे राजकीय खळबळ निर्माण झाली आहे.
‘टीएमसीने सरकारला पाठिंबा दिला असला, तरी निर्णय प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा
आरोप करत प्रतिनिधिमंडळातून माघार घेतल्याने केंद्र-राज्य संबंधांमध्ये नव्या संघर्षाची चिन्हं दिसत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/jammu-kashmir-shopianmadhye-dunvadhyanya-don-sathi-sartar/