मुंबई :
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर
(PoK) मधील ९ दहशतवादी तळांवर प्रतिहल्ला करत ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
या कारवाईच्या काही तासांतच बॉलिवूडमधील अनेक निर्माते ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव चित्रपटासाठी
रजिस्टर करण्यासाठी स्पर्धा करू लागले. या टायटलवर आधारीत चित्रपटाची
अधिकृत घोषणा आता करण्यात आली असून त्यासोबतच वादही उफाळले आहेत.
विवादित घोषणा आणि माफी
ज्येष्ठ निर्माते जॅकी भगनानी यांचे चुलत भाऊ विक्की भगनानी आणि निक्की भगनानी यांनी
‘ऑपरेशन सिंदूर’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट निक्की विक्की भगनानी फिल्म्स आणि
द कंटेंट इंजिनिअर प्रॉडक्शन्स या बॅनरखाली तयार होणार आहे.
दिग्दर्शनाची धुरा नितीन कुमार गुप्ता आणि उत्तम माहेश्वरी सांभाळणार आहेत.
या घोषणेसोबतच प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानीने एक एआय जनरेटेड पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले,
ज्यामध्ये एक महिला सैनिक बंदूक हातात घेऊन उभी आहे. पोस्टरवर “भारत माता की जय – ऑपरेशन सिंदूर” असे लिहिले आहे.
मात्र या घोषणेनंतर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला गेला.
सामाजिक प्रतिक्रिया आणि तणावाचा प्रश्न
देशात भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरण असताना अशा संवेदनशील विषयावर तातडीने
चित्रपटाची घोषणा करणे गैर असल्याचे अनेकांचे मत आहे. काही जणांनी याला “मेकर्सना केवळ अटेंशन पाहिजे” अशी टीका केली.
विरोधानंतर निर्मात्यांनी माफी मागितली असून, जनभावनांचा आदर करत स्क्रिप्ट
आणि वेळेबाबत फेरविचार केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-shaharat-vadi-vyasah-viger-paus/