काँग्रेसच्या दिल्लीत मोठ्या हालचाली
अकोला : लोकसभा निवडणुकीच्या कलांनुसार भाजप प्रणित एनडीए आणि काँग्रेस प्रणित इंडी आघाडीमध्ये चुरशीची लढत होताना दिसत आहे. भाजपा 298 जागांवर आघाडीवर असली तरी बहुमताचा आकडा गाठताना दोघांचीही दमछाक होणार आहे. अशातच भाजपाच्य साथीला असलेले व कोणत्याही क्षणी या गोटातून त्या गोटात उड्या मारू शकणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमा आणि आंध्र प्रदेशचे चंद्राबाबु नायडू किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.
यामुळे या दोघांचा संपर्क करण्याच्या हालचाली काँग्रेसमध्ये सुरू झाल्या असून या दोघांना चांगली ऑफर आली तर ते इंडिया आघाडीसोबत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सध्या नायडूंचा तेलगू देसम पक्ष 16 जागांवर आघाडीवर आहे. तर नितीश कुमार यांचा पक्ष 12 जागांवर आघाडीवर आहे. या दोघांच्या जागा 28 ते 30 च्या आसपास आहेत. जर भाजपाला काठावर बहुमत मिळाले तर हे दोघेच किंगमेकर ठरणार आहेत. अशात ते काँग्रेससोबतही जाऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केल्या जात अहे. गेल्या काही काळापासून नितीशकुमार हे एनडीएच्या प्रचारात दिसले नाहीत. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. काल नितीशकुमारांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. सर्व प्रमुख पक्षांची राजकीय रणनीती वेगाने बदलू लागली आहे. सत्ता टिकवण्यासाठी भाजपला गुंतागुंतीच्या वाटाघाटी आणि धोरणात्मक आघाड्या बांधण्याची गरज आहे. तर काँग्रेसला या दोघांना फोडले तर सत्तेत जाण्याची संधी खुणावत आहे. यामुळे या दोघांशी काँग्रेस नेत्यांकडून संपर्क करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
महाराष्ट्रात उलथापालथ
देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील 30 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी पुढे असून 17 जागांवर महायुतीने आघाडी घेण्यात यश मिळवले आहे. तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने मताधिक्य घेतले आहे. महाराष्ट्रात काही मतदारसंघांमध्ये मोठ्या उलथापालथीचे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Related News
अकोला: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त अकोल्यात
एक प्रेरणादायी आणि अभूतपूर्व उपक्रम राबवण्यात आला आहे.
अकोला शहरातील जुन्या बस स्थानक परिसरात तब्बल १८०...
Continue reading
प्रतिनिधी: रामेश्वर कावरे | उमरा, अकोट तालुका
अकोट तालुक्यातील उमरा गावाच्या सीमेवर असलेल्या ११ केव्ही कासोद फिडरवरील रोहित्राजवळ,
एका मेंढीपाळकावर भीषण प्रसंग ओढावला. दि. १२ एप्...
Continue reading
मुर्तीजापुर | अधर खान
शासनाच्या निद्रिस्त अवस्थेला धक्का देण्यासाठी, आणि शेतकरी व दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रहार
जनशक्ती पक्षाने ११ एप्रिलच्या रात्री मुर्तीजापुर येथे जोरदार मशा...
Continue reading
अकोला –
एका वयोवृद्ध व्यक्तीची बॅग बळजबरीने हिसकावून पळून गेलेल्या अनोळखी आरोपींच्या मुसक्या आवळण्यात
अकोला पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आलं आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडवली ...
Continue reading
नवी दिल्ली –
गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेमुळे भारतात सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहोचले आहेत.
सध्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 93,390 रुपये, तर 2...
Continue reading
जळगाव –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना डंपरद्वारे ठार मारण्याची धमकी देणारा खळबळजनक ई-मेल मुख्यमंत्री
कार्यालयाला प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मेलमध्ये केवळ जिल्हाधिका...
Continue reading
अहमदाबाद –
शहरातील खोखरा परिसरात एका उंच इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी इलेक्ट्रिक
कुकरमुळे अचानक आग लागली. या आगीत दाट धूर संपूर्ण अपार्टमेंटमध्ये पसरला होता.
या दर...
Continue reading
मुंबई, १२ एप्रिल –
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण तापले असून, आता स्वाभिमानी शेतकरी
संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी थेट कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि...
Continue reading
अकोला, १२ एप्रिल –
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अकोला शहरात
तीव्र आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक
...
Continue reading
अकोट, ता. १२ एप्रिल –
अकोट तालुका व शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती
आंदोलनासाठी स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. बुद्धगया येथील महाबोधी ...
Continue reading
मुंबई: अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात १६,००० पानी
आरोपपत्र दाखल केले असून, त्यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
या आरोपपत्रात सैफच्या पत्नी करीन...
Continue reading
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य सरकारच्या
वतीने 14 व 15 एप्रिल 2025 रोजी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट' या विशेष
मोफत सहल...
Continue reading