अकोट तालुक्यातील टाकळी बु परिसरात रेती तस्करीची घटना गंभीर बनली आहे. मागील महिनाभरात नदी पात्रातील घाटावर रेती तस्करांनी महसूल प्रशासनाच्या नाकावर निंबू टाकून, मोठ्या प्रमाणात अवैध रस्त्यांचा वापर करून रात्रीच्या सुमारास शेकडो ब्रास रेती उपसून शासनाचा महसूल बुडविला आहे. स्थानिक महसूल प्रशासनाने फक्त रस्त्यावर खड्डे खोदून पर्यावरणाचे रक्षण केल्याचा दिखावा केला; मात्र नागरिकांच्या मते ही कारवाई अपुर्या ठरली आहे.
स्थानिक नागरिकांच्या भावना पाहता, प्रशासनाकडून सर्जिकल स्ट्राईक (धडक कारवाई) करण्याची गरज आहे. जेव्हा तस्कर जेसीबी आणि इतर यंत्रसाधनांच्या साहाय्याने मोठे रस्ते बनवून शेकडो ब्रास रेती चोरी करतात, तेव्हा रात्री खड्डे बुजवून आणखी रेती उपसा केली जाते. यामुळे ट्रॅक्टरच्या कर्कश आवाजामुळे आजूबाजूच्या गावकऱ्यांची झोप बाधित होत आहे.
टाकळी बु परिसरातील नदी घाटावर यावर्षी अद्याप अधिकृत लिलाव झाला नसतानाही अवैध रेती उपसा होत असल्याने महसूल प्रशासनावर संगणमताचे आरोप होत आहेत. नदीपात्राची खोली अनियंत्रित वाढल्याने जलस्त्रोत धोक्यात आले आहेत, आणि ओव्हरलोड वाहनांमुळे ग्रामीण रस्ते उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे सरकारचा कोट्यवधींचा महसूल माफियांच्या खिशात जात आहे.
Related News
विरार, पालघर – सहकाऱ्यांसोबत पायी तीर्थयात्रेवर निघालेल्या २१ वर्षीय जैन भिक्षू नम्ररत्न विजय यांच्या अचानक मृत्यूने जैन समाजात शोककळा...
Continue reading
नाशिक न्यूज: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी परिसरात एका विद्यार्थीची आत्महत्या झाली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे...
Continue reading
पुणे जिल्ह्यातील सासवड परिसरात रमजान महिन्यादरम्यान इफ्तारीच्या तयारीत असलेल्या मुस्लीम तरुणांसोबत धक्कादायक घटना घडली आहे. ऑस्करवाडी भागातील एका तलावाजव...
Continue reading
पश्चिम आशियातील परिस्थिती सध्या अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता अशा टप्प्यावर पोहोचला आहे, जिथे केवळ कूटनीतीने परिस्थिती नियंत्रित करणे कठीण ठरले आहे. अम...
Continue reading
Nashik Bus Accident : नाशिक जिल्ह्यातील सुमारे ५० भाविकांची तीर्थयात्रेची बस कानपूरजवळ अपघातग्रस्त. एका भाविकाचा मृत्यू, अनेक जखमी. जखमींवर...
Continue reading
नागपूर : महावितरणतर्फे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शिल्पकार, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा पाया घालणारे आणि सहकार चळवळीचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले...
Continue reading
Smartphone Price Hike : 16 मार्चपासून OPPO आणि OnePlus स्मार्टफोनचे दर वाढणार आहेत. वाढत्या पार्ट्स किंमतीमुळे ग्राहकांना होणार मोठा आर्थ...
Continue reading
Maharashtra मधील व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठ्यात मोठा तुटवडा; नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरमधील हॉटेल व उद्योगांवर परिणाम. LPG Short...
Continue reading
नागपूर : महिलांनी कार्यालयीन जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःच्या आरोग्याची जपणूक करणे तितकेच महत्त्वाचे आहे. कामाच्या धावपळीमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष न करता योग्य आहार, नियमित व्यायाम...
Continue reading
भंडारा जिल्ह्यातील Pawni शहरात एक धक्कादायक आणि तितकाच विचार करायला लावणारा प्रकार समोर आला आहे. शाळेतील शिक्षेच्या भीतीने अवघ्या 12 वर्षांच्या विद्यार्थ्याने स्वतःच्याच अपहरणाचा ब...
Continue reading
राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसेच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त सदस्य नोंदणी मोहीम सुरु; रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, पदाधिकाऱ्या...
Continue reading
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. अवघ्या तीन वर्षांच्या निष्पाप दत्तक म...
Continue reading
स्थानीय प्रशासनाने महसूल, पोलीस आणि आरटीओ यांचे संयुक्त पथक तयार करून रात्रीची गस्त वाढवणे आवश्यक आहे. फक्त दंड न आकारता, तस्करी करणाऱ्या वाहनांवर कायमस्वरूपी जप्तीसारखी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच, नदीपात्रातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक आहे. फक्त ट्रक चालकांवर कारवाई न करता, मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना याकडे विशेष लक्ष देऊन भरारी पथके तैनात करावी लागेल. स्थानिक महसूल कर्मचारी गस्तवर असतानाही तस्करांना अधिकारी घाटावर पोहचण्यापूर्वी माहिती मिळते, त्यामुळे ते पसार होतात. यामुळे गुप्त आणि वेगवान सर्जिकल स्ट्राईक सारखी कारवाई करणे गरजेचे ठरते, ज्यामुळे रेती माफियांना वेसन घालता येईल.
read also : https://ajinkyabharat.com/shocking-suicide-of-a-student-of-trimbakeshwar-pimpri-area-mourning-in-the-area/