मुलांच्या भविष्यासाठी मी आज पहिल्यांदा बाहेर पडली आणि भाषण करतेय.
विद्यार्थी जीवनात असे मंच फार महत्वाचे आणि प्रेरणादायी ठरत असतात.
आपल्या कामाला आणि त्यामागील मेहनतीला प्रोत्साहन मिळालं
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
तर आपण अधिक जोमाने काम करत असतो.
असे असले तरी मी माझ्या राजकीय परीक्षेत नापास झाली.
मी कुठं तरी कमी पडली असेल, मात्र मी कधीही हार मनाली नाही.
माझ्या पराभवाचा काही जणांना खूप आनंद झाला.
मात्र चमकणारा तारा नेहमी चकमतच राहतो, मग तो कुठेही राहो.
आता आगामी काळात मी परत तयारी करून परत राजकारणाच्या नव्या
मैदानात उतरणार, असे म्हणत माजी खासदार नवनीत राणा यांनी निर्धार केला आहे.
अमरावती येथे युवा स्वाभिमान पार्टीद्वारा आयोजित दहावी
आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या.
आधी नवनीतला हरवलं आता रवी राणाला हरवू, असे काही लोक म्हणतात.
पण जनतेचा आशिर्वाद आमच्या पाठीशी आहे.
मी हरली पण मी कधीही हार नाही मानली.
माझ्या पराभवानंतर आमदार रवी राणा यांनी मला प्रोत्साहित केलं.
किंबहुना त्यांनी मला पुन्हा उभे राहण्याचेही सुचवले.
आयुष्यात ते कायम माझ्या पाठीशी राहिले आहे.
असे प्रोत्साहन नक्कीच यश खेचून आणण्यासाठी उपयुक्त ठरत असतात.
गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान केलं त्यांचे आभार,
पण ज्यांनी नाही केलं त्यांना एकच सांगते की, १० वर्ष अमरावती मागे गेलीय,
त्याची जबाबदारी आता कोण घेईल. आपण सगळ्यांनी मेहनत केली.
आता देखील कंबर कसून विधानसभेत तुमची तयारी हवी आणि
यावेळी पुन्हा एकदा ताकद दिसली पाहीजे. असे आवाहन ही नवनीत राणा यांनी केलंय.