नाशिक-मुंबई महामार्गालगत असलेल्या जिंदाल कंपनीत लागलेली आग आज सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा धुमसत आहे.
तब्बल 72 तास उलटल्यानंतरही ही आग पूर्णतः आटोक्यात आलेली नसून,
संपूर्ण परिसरात प्रचंड धुराचे काळे लोट आकाशात झेपावत आहेत.
Related News
वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि पुन्हा अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार डोनाल्ड ट्रम्प
यांनी अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेची (Air Defence System) घोषणा केली आहे.
या यंत्रणेचं ...
Continue reading
पुणे (प्रतिनिधी): लग्नात अपेक्षित हुंडा व मानपान न मिळाल्याने विवाहितेचा सासरच्या
मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ सुरू होता. या छळाला कंटाळून हडपसर
येथील 22 वर्षीय दीपा उर्फ देवकी...
Continue reading
बच्चन सिंग यांची नागपूर कमांडर म्हणून बदली; आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदल
अकोला (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून राज्यभरातील पोलीस अधीक्षकांच्या
...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी): काल झालेल्या जोरदार पावसामुळे डाबकी रोड परिसरात
वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पावसाच्या तीव्रतेमुळे रस्ते जलमय झाले असून,
सुरू असलेल्या रस्ते रुंदीकरण...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी): इयत्ता दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील
कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया जोमात सुरू झाली आहे.
१९ मेपासून सुरू झाले...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून अकोल्यातील पातुर, बाळापूर तालुक्यांसह इतर
भागांमध्ये सतत घिरट्या घालणाऱ्या विमानामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती.
...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी): अकोला शहरात गेल्या एक तासापासून प्री-मान्सून पावसाने जोर धरला
असून शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र आहे.
काही ठिकाणी रस्त्यांवर जलजमाव झाल्याने वाह...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी): अकोल्याच्या अकोट फाईल परिसरातील पूरपीडित इंदिरानगरमध्ये
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात
आल्याची धक्कादायक घटना समोर आली...
Continue reading
अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच असून अनेक ठिकाणी
आलेल्या पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. तर आगामी खरीप हंगामाची तयारीही खोळंबली आहे.
अकोल्यातील गोर...
Continue reading
नवी दिल्ली (प्रतिनिधी) – पाकिस्तानसाठी जासूसी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात
आलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रा उर्फ ‘ज्योती राणी’ या प्रकरणात एक नवा खुलासा समो...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी) – लग्नसमारंभ म्हटले की विविध आकर्षक कार्यक्रम,
आधुनिक ट्रेंड्स हे सामान्य झाले असताना अकोल्यात एका विवाहसोहळ्याने सामाजिक व धार्मिक
जाणीवेचा नवा आदर्श निर्माण क...
Continue reading
अकोला : शहरातील अकोट फैल येथील अब्दुल कलाम चौकाजवळील गौसिया मशिदीच्या गल्ली
परिसरात सोमवारी (२१ मे) संध्याकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या अवकाळी
पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण...
Continue reading
या आगीत कंपनीतील एक संपूर्ण प्लांट आगीच्या भक्ष्यस्थानी गेला आहे.
30 ते 40 अग्निशमन बंब घटनास्थळी:
नाशिकसह ठाणे, मुंबई, मालेगाव महापालिका आणि अन्य नगरपालिकांमधून ३० ते ४० अग्निशमन गाड्या
आग आटोक्यात आणण्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. मात्र, कंपनीमध्ये वापरले जाणारे
पाणी अपुरे पडत असल्याने इतर कंपन्यांकडूनही पाण्याचा पुरवठा मागवला जात आहे.
एलपीजी टाकीचा धोका कायम:
नाशिक महापालिकेचे प्रभारी अग्निशमन अधिकारी प्रदीप बोरसे यांनी माहिती दिली की,
कंपनीच्या परिसरात एलपीजी गॅस टाकी आहे. टाकीचे तापमान वाढू नये म्हणून सतत
पाणी आणि फोमचा मारा करून तापमान नियंत्रित ठेवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
ही टाकी पेटल्यास मोठा स्फोट होऊन गंभीर अनुर्थ घडू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
एनडीआरएफ तुकडीची मागणी:
आग नियंत्रणाबाहेर जात असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून एनडीआरएफ
(राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) तुकडी मागवण्यात आली आहे. पुणे येथील बेस कॅम्पशी संपर्क साधण्यात आला असून,
गुरुवारी पहाटेपर्यंत एनडीआरएफची तुकडी घटनास्थळी दाखल होण्याची शक्यता आहे,
अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी दिली.
कामगार जखमी, कंपनीत आग लागण्याची दुसरी वेळ:
या दुर्घटनेत दोन कामगार जखमी झाल्याचे कळते. विशेष म्हणजे ही आग जिंदाल कंपनीत लागलेली दुसरी वेळ आहे.
बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आगीचा भीषण भडका उडाला होता. पॉलिफिल्म तयार करण्यासाठी असलेला
कच्चा माल व रसायनांमुळे आग वेगाने पसरून अनियंत्रित झाली.
सततची आग व अपयशी नियंत्रणामुळे नागरी प्रशासनावरही प्रश्नचिन्ह:
तिसऱ्या दिवसापर्यंत आग आटोक्यात येऊ न शकल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व भीतीचे वातावरण आहे.
जिवितहानी टळली असली तरी पर्यावरण व सार्वजनिक आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/dhakkadayak-hadpasaramadhye-22-year-old-married-hundyasathi-chha/